शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘निवडणूक प्रक्रियेचा मी सन्मान करतो’

By admin | Updated: September 23, 2014 04:56 IST

‘लोकसंग्रह हा वारकरी परंपरेचा स्थायीभाव आहे. लोकांचा कौल आजमावून अध्यक्षपदी निवडून येण्याची पारदर्शक प्रक्रिया मला भावते

औरंगाबाद : ‘लोकसंग्रह हा वारकरी परंपरेचा स्थायीभाव आहे. लोकांचा कौल आजमावून अध्यक्षपदी निवडून येण्याची पारदर्शक प्रक्रिया मला भावते.’ अशी भूमिका संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मांडली. पंजाब प्रांतातील घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी यांचे नाव सुचवणारा अर्ज सोमवारी मराठवाडा साहित्य परिषदेतून दाखल झाला. याआधी त्यांचा अर्ज १५ सप्टेंबरला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आला आहे. या अर्जावर सूचक म्हणून प्रा. जयदेव डोळे यांनी सही केली. यासह श्रीकांत उमरीकर, प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, श्याम देशपांडे, प्रमोद माने व जीवन कुलकर्णी हे अनुमोदक आहेत. अध्यक्षपदासाठी मोरे यांच्यासह संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत व कथाकार भारत सासणे रिंगणात आहेत.निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेचाच एक भाग असून, सार्वजनिक वृत्तीचा मनुष्य म्हणून ती वर्ज्य नसल्याचे डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. अर्ज दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेत डॉ़ मोरे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेतही काही सुधारणा होणे गरजेचे असून, अध्यक्षपद सन्मानाने मिळाले तर ते अधिक चांगले़ संत नामदेवांचा प्रवास हा मराठवाड्यातील त्यांचे जन्मगाव नरसी ते पंजाबमधील घुमान असा झाला आहे. संतजनांनी मराठीला महाराष्ट्राबाहेर नेण्याचे अभिमानास्पद कार्य केले. अशावेळी घुमानमधील संमेलनाचा अध्यक्ष संतपरंपरेतील असणे औचित्यपूर्ण ठरते. मात्र तुकारामांच्या वंशात जन्मलेला मी परंपरेचा केवळ चालक नसून डोळस अभ्यासक आहे.’ संतसाहित्य हा मराठी साहित्य प्रकारातील मुख्य प्रवाह आहे. सध्या काहीसा मागे पडला असून, तो पुन्हा वाहता व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मोरे म्हणाले.