शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयच अत्यवस्थ!

By admin | Updated: June 8, 2017 01:05 IST

तीर्थक्षेत्र जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही धोकादायक इमारतीत असून तिथे रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या व पुणे-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या मार्गावर असणाऱ्या महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र जेजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अद्यापही धोकादायक इमारतीत असून तिथे रुग्णांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत. प्रशासनातील समन्वयाभावी इमारतीचे काम रखडले आहे. ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळून ११ वर्षांचा काळ लोटला असला तरी अजूनही जुन्या जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या आणि पावसाळ्यात गळत असलेल्या धोकादायक इमारतीमध्ये अपुऱ्या सुविधेमध्ये रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत. अपघातामधील जखमींना व अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आसरा अथवा पुणे येथील ससून रुग्णालयाची वाट धरावी लागते. रुग्णालयात महिन्याला साधारणपणे साडेतीन ते चार हजार रुग्णांवर उपचार केले जातात. ३० बेडचे रुग्णालय मंजूर असताना केवळ इमारत नसल्याने केवळ सात बेडवर रुग्णालय चालवावे लागते. २०११-१२ मध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला असला तरी गेल्या दीड वर्षापासून हे काम बंद आहे. सुमारे ७० टक्के काम झाले असले तरी बांधकाम व इतर सोई-सुविधा निर्माण करून प्रत्यक्षात नूतन इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित होण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींना कधी मुहूर्त मिळणार? असा सवाल आता विचारण्यात येऊ लागला आहे. एप्रिल २००६ मध्ये तत्कालीन आमदार अशोक टेकवडे यांच्या प्रयत्नामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला. वास्तविक २०१३-१४ मध्ये काम पूर्ण होऊन नवीन इमारतीमध्ये रुग्णालय स्थलांतरित होणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने आजतागायत ९० टक्के इमारतीचे काम झाले असून, गेल्या दोन वर्षांपासून तर काम ठप्पच आहे.रुग्णालयाच्या कामाची उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, पुरंदर, आर. पी. आय.च्या वतीने ग्रामीण रुग्णालयाचे काम त्वरित पूर्ण करून जुन्या इमारतीतील ग्रामीण रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी रुग्णालयासमोरच जागरण गोंधळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करून लवकरात लवकर रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याची आश्वासने दिली आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही वस्तुस्थितीची पाहणी करून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यात ४ कोटी १८ लाख खर्चून मुख्य इमारतीचे काम करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ४ कोटी ५५ लाख रुपयांची शवविच्छेदन इमारत, पार्किंग, वीज, पाणीपुरवठा, लिफ्ट जनरेटर, तसेच फर्निचरची कामे करावयाची आहेत, तर तिसऱ्या टप्प्यात ३ कोटी ६९ लाख रुपये खर्चून अधिकारी, कर्मचारी निवासस्थान इमारतींची कामे करावयाची आहेत. या सर्व कामांसाठी शासनाने संपूर्ण निधी वर्ग केलेला आहे. याचाच अर्थ इमारतीच्या संपूर्ण कामाचे पैसे प्राप्त होऊनही काम रखडलेल्या अवस्थेत राहिले आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधला असता आतापर्यंत आपणास १० कोटी २५ लाख रुपयांची बिले मिळाली आहेत. उर्वरित काम आपण दोन महिन्यांत पूर्ण करणार आहोत. मात्र सार्वजनिक बांधकामकडून सहकार्य होत नसल्याचीच तक्रार केली आहे. कामाची बिले अदा; तरीही काम रखडलेलेदुसरीकडे पालिकेकडून रुग्णालयाला केवळ जागा देणे होते, ती दिलेली आहे. सार्वजनिक विभागाकडूनही केलेल्या कामाची बिले अदा करण्यात आलेली आहेत.तरीही काम रखडले आहे. समन्वय नसल्यानेच काम रखडलेले निदर्शनास येत आहे.