शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

हिंदस्थान हे हिंदुराष्ट्रच - उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना पाठिंबा

By admin | Updated: August 21, 2014 09:28 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे. 'देश हिंदुत्वाने भारला आहे, हिंदूंच्या विचारांचा वणवा भडकला आहे, यापुढे हिंदू समाज अपमान सहन करणार नाही. कुणाची हरकत असो वा नसो हे हिंदू राष्ट्रच आहे'  असे मत सामनातील अग्रलेखाद्वारे मांडण्यात आले आहे. सं
सरसंघचालकांवर होणा-या टीकेत आश्चर्य वाटण्यासारखे नाही, ज्या देशाचा डोलारा बेगडी निधर्मीवादाच्या ठिसूळ पायावर उभा आहे व जेथे मुस्लिम लांगूलचालन हेच राजकीय पोटापाण्याचे उद्योग आहेत तेथे दुसरे काय होणार असेही लेखात म्हटले आहे. देशात काँग्रेसचे सरकार असताना व मुसलमानी मतांसाठी हिंदू समाजाची गळचेपी सुरू असतानाही आधी स्वातंत्र्यवीर सावरकर व नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी अनेकदा 'हे हिंदू राष्ट्रच आहे' असे ठणकावून सांगितले होते. त्यांनी हिंदुत्वाचा अंगार चेतवल्यानेच कॉंग्रेस व त्यांच्या बगलबच्यांच्या निधर्मी ढोंगाची राखरांगोळी झाली. 
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे -
मोदी हे पंतप्रधान झाले ते त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांमुळेच व या देशातील समस्त हिंदू समाजाने जात, पंथ विसरून फक्त हिंदू म्हणूनच शिवसेना-भाजपास मतदान केले. कॉंग्रेसच्या मुसलमानी चाटुगिरीस वैतागलेल्या हिंदू समाजाने बेगडी निधर्मीवादाला मूठमाती दिली व संपूर्ण उत्तर प्रांतात दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह बिहारात एकही मुसलमान खासदार निवडून येऊ शकला नाही. 
हा हिंदू एकजुटीच्या वज्रमुठीचा विजय आहे व ही वज्रमूठ अशीच राहिली तर हा देश ‘हिंदुराष्ट्र’ म्हणून मान्यता पावण्यास फारसा उशीर लागणार नाही.  लोकसभा निवडमुकूतही हेच चित्र दिसले. हिंदूंच्या संयमाचा बांध फुटला व त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी वगैरे पक्षांच्या सरकारने १५ टक्के मुस्लिमांच्या धर्मांधतेपुढे सतत गुडघे टेकले आणि त्याचवेळी ८५ कोटी हिंदूंना अपमानित केले आणि त्यांची सहनशक्ती संपली. 
ज्या वंदे मातरम्ने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली ते वंदे मातरम् गायचे नाही,  कारण पंधरा टक्के मुस्लिम समाजातील धर्मांध नेते विरोध करतात. वंदे मातरम्मुळे मुस्लिमांच्या भावना दुखावतात. त्यांचा इस्लाम खतर्‍यात येतो. 
या देशातील मुसलमान कुटुंब नियोजन पाळत नाही. कारण ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ ही संकल्पना इस्लामला मान्य नाही. हिंदूंनी लोकसंख्या कमी करायची व मुसलमानांनी वाढवायची. त्यामुळे देशाचा समतोल बिघडला व कॉंग्रेससह सर्व बेगडी निधर्मीवाद्यांनी मुस्लिम मतांसाठी हिंदूंचे अस्तित्वच धोक्यात आणले.
त्यामुळे हिंदू चिडला. तो आधी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी उभा राहिला व आता शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद लाभलेल्या मोदी यांच्या पाठीशी उभा राहिला! 
उत्तर प्रदेशात मुलायम यांचे पुत्र राज्य करत असून तेथे हिंदू मुलींना दिवसाढवळ्या उचलून बलात्कार केले जातात. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जाते व त्याविरोधात आवाज उठविणार्‍यांना गुन्हेगार ठरविले जाते. या सर्व प्रकारामुळे त्यामुळे हिंदू चिडला व त्यांनी लोकसभा निवडणुकीत मुलायम यांचे पानिपत केले. उत्तर प्रदेशातील यादवी संपली व तेथे हिंदुत्ववादी विचारांचे ७१ खासदार निवडून आले. हिंदुत्वाचा हा विजय म्हणजेच हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्र होत असल्याची पोचपावतीच आहे.
मोदी सत्तेवर येताच हिंदूची अस्मिता ठिणग्यांप्रमाणे चमकू लागली आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी आज खुलेआम सांगितले की, हे हिंदुराष्ट्रच आहे! जनतेने मुस्लिम धर्मांधांना पाठीशी घालणारे सरकार खाली खेचले आहे. 
कॉंग्रेसचे सरकार दिल्लीत आणखी काही काळ राहिले असते तर आणखी एका पाकिस्तानच्या मागणीस जोर चढला असता व हे राष्ट्र इस्लामी धर्मांधांचे गुलाम झाले असते, पण लोकशाही मार्गाने हे राष्ट्र हिंदुराष्ट्र झाले. देश हिंदुत्वाने भारला आहे. यापुढे हिंदू समाज अपमान सहन करणार नाही. जो अपमान सहन करेल तो हिंदू रक्ताचा नाही. हिंदूंच्या विचारांचा वणवा भडकला आहे. होय, हे हिंदुराष्ट्रच आहे! कुणाची हरकत असो अगर नसो!