शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांच्या यात्रेवर अवकाळी संकट !

By admin | Updated: March 18, 2015 01:29 IST

किसान संघर्ष यात्रेवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने संकट उभे ठाकले असून ही यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते़

पारनेर (अहमदनगर) : भूसंपादनाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून ३० मार्चपासून वर्धा ते दिल्ली काढण्यात येणाऱ्या किसान संघर्ष यात्रेवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने संकट उभे ठाकले असून ही यात्रा रद्द करण्यात येणार असल्याचे समजते़अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त झालेला शेतकरी, वाढते ऊन, गव्हाची काढणी व आदी कारणास्तव यात्रा रद्द करण्याबाबत ठरल्याची सूत्रांनी माहिती दिली. राज्यसभेत भूमी संपादन कायद्यावर काय निर्णय होतो, त्यानंतर जाहीर सभांबाबत नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते. भूसंपादनाच्या विरोधात अण्णांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांना पत्र पाठविली आहेत. मोदी सरकारचा भूमी संपादन कायदा शेतकरीविरोधी असल्याचे सांगत देशभरातील शेतकरी संघटनांनी त्यास विरोध केला होता. अण्णांनी शेतकरी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. कायद्याविरोधात दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलनही केले होते. त्यानंतर वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्याची घोषणाही वर्धा येथील बैठकीनंतर करण्यात आली होती. मात्र राज्यसभेत भूमी संपादन विधेयक संमत झाल्यावर आंदोलन करता येणार नाही़, ही भूमिका अण्णांनी मांडली आहे. त्याचाच भाग म्हणून अण्णांनी राज्यसभेत विधेयक संमत होऊ नये म्हणून सोनिया गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांना पत्र पाठवून सरकारच्या विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. काही शेतकरी संघटनांनी अण्णांची राळेगणसिद्धीत भेट घेऊन अण्णांना पदयात्रेऐवजी मोठी शहरे, गावांमध्ये जाहीर सभा घेण्याबाबत सुचविले आहे. (प्रतिनिधी)च्अण्णांच्या कार्याने प्रेरित होऊन महाराष्ट्रासह विविध राज्यांतील दीड हजार युवक व ज्येष्ठ नागरिकांनी देशसेवेचे काम करणार असल्याचे शपथपत्र त्यांना दिले आहे़ मंगळवारी राळेगणसिद्धीत कार्यकर्ता शिबिर झाले. हजारे यांनी देशासाठी काम करणाऱ्यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय संघटनेची बांधणी करणार असल्याचे सांगितले़विचार सुरू किसान यात्रा रद्द करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भासह इतर राज्यांत पुढील दोन महिने कडक उन्हाळा असतो. काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या गव्हाच्या कापण्यांमुळे शेतकरी कामात आहेत. शिवाय राज्यसभेत विधेयकाचे काय होते त्यावरच आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.