शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

दुष्काळी परिस्थितीचे सरकारला गांभीर्य नाही, शरद पवार यांचा आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:51 AM

राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे.

मुंबई  - राज्यात अनेक ठिकाणी मोठा दुष्काळ पडला असून, पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत, जनावरे तडफडत आहेत. यावर तात्काळ मार्ग काढण्याची गरज आहे. पण दुष्काळाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा पक्षाने घेतला आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. दुष्काळी संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यामध्ये सरकार कमी पडले. दुष्काळाबाबत दौरे करण्यास व निर्णय घेण्यास सरकारला उशीर झाला आहे. सरकारने फळबागा वाचविण्यासाठी अतिरिक्त मदत द्यावी. पशुधन वाचविण्यासाठी निधी वाढवावा. शेतकऱ्यांकडून होत असलेली सर्व प्रकारची वसुली त्वरित थांबवावी. कर्जमाफी व कर्ज पुनर्गठनाबाबत निर्णय घ्यावा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुष्काळ निवारणाचे काम करताना निवडणूक आयोगाचा अडथळा होत नाही, असा आपला अनुभव असल्याचे पवार म्हणाले.मुख्यमंत्र्यांची घेतली भेटराज्यातील भीषण दुष्काळाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, राजेश टोपे हे या शिष्टमंडळात होते.राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा अधिकार नाहीराज ठाकरे यांची पाठराखण करताना पवार म्हणाले की, राज यांच्या पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने त्यांच्याकडून सभांचा खर्च मागणे चुकीचे आहे. या काळात आपली मते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असून, तो लोकशाहीने दिलेला आहे. १९७७ मध्ये आणीबाणीविरोधात पु. ल. देशपांडे व इतरांनी प्रचार केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणीही प्रचाराचा खर्च मागितला नव्हता, याचे स्मरण पवारांनी आयोगाला करून दिले.मोदी काहीही बोलतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज आहे. निकालानंतर देशात नवीन सरकार अस्तित्वात येईल. राष्ट्रपतींनी संधी दिल्यावर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हानात्मक काम केवळ आम्हीच करू, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षणमंत्री म्हणून मी काम केले आहे. आम्ही संरक्षण खात्याच्या कामगिरीचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही. दलाच्या कामगिरीचा गैरवापर निवडणुकीसाठी केला जाणे दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती असा गैरवापर करत आहे, हे अधिक दुर्दैवी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे कान टोचले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार