शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

नवीन भरती करणार नसल्याचे शासनानेच कोर्टात सांगितले; खा. उदयनराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:20 IST

तामिळनाडूत मद्रास उच्च न्यायालयाने ६९ टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाला स्थगिती दिली नाही. सर्व पक्षांच्या एकजुटीने आरक्षण तेथे टिकले. तशीच एकजूट महाराष्ट्रात व्हावी, यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत नवीन भरती करणार नाही, असे राज्य शासनाने सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली, असा दावा भाजपचे राज्यसभा
सदस्य छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
या पत्रात उदयनराजे यांनी, अंतरिम स्थगितीचा आदेश येताच घाईघाईने शैक्षणिक प्रवेशास स्थगिती देण्याचा सरकारचा नेमका हेतू काय होता, असा सवाल केला आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा लढा एकजुटीने लढल्यामुळे यश मिळाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात सरकारी वकिलांमध्ये बेबनाव होता का, याबाबत समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर सरकारने खुलासा करावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
तामिळनाडूत मद्रास उच्च न्यायालयाने ६९ टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाला स्थगिती दिली नाही. सर्व पक्षांच्या एकजुटीने आरक्षण तेथे टिकले. तशीच एकजूट महाराष्ट्रात व्हावी, यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे.

उदयनराजेंचे सरकारला प्रश्न
1. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली का?
2. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत आरक्षण कायम का ठेवत नाही?
3. मराठा क्रांती मोर्चा आंदोलनादरम्यानच्या गंभीर गुन्ह्यांची वेगळी चौकशी करा, पण त्या व्यतिरिक्तचे गुन्हे तत्काळ मागे घेणार का?
4. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय नेते, आमदार, खासदारांची संयुक्त बैठक बोलाविणार का?

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण