शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

भाजप सरकार बिल्डर, इस्टेट वाल्यांचे आहे : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 3:46 PM

माढा तालुक्यातील अरण येथे माळी समाज सत्तासंपादन महामेळावा

ठळक मुद्दे- प्रकाश आंबेडकरांची भाजप सरकारवर जोरदार टिका- माळी समाजाच्या सत्ता संपादन महामेळाव्यात आंबेडकरांची भाजप सरकारवर ताशेरे- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातवरण तापले

अरण: आताच्या सरकारवर कोणाचा विश्वास नाही आणि सरकारचाही कोणावर विश्वास नाही. हे सरकार बिल्डर आणि इस्टेट वाल्यांचं सरकार आहे. ३३००० कुटुंबे देश सोडून गेली आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी केली.

माळी समाज सत्ता संपादन महामेळाव्यात अरण येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शंकरराव लिंगे होते. प्रारंभी आंबेडकर यांचा सत्कार महात्मा फुले यांची पगडी घालून आणि संत शिरोमणी सावता महाराजांचे खुरपे देऊन करण्यात आला. सभेला वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शाहीर सचिन माळी, बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कर, सासवड माळी शुगरचे रंजनभाऊ गिरमे, गोपीचंद पडळकर, अ‍ॅड. अशोक ताजने, शिवानंद हैबतपुरे, आण्णाराव पाटील, महिला आघाडी अध्यक्षा किरणताई गिºहे, डॉ. अरुणा माळी, बाबासाहेब माळी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, आनंद चंदनशिवे, बाळासाहेब माळी, पोपट माळी, सचिन गुलदगड उपस्थित होते. 

यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना शंकरराव लिंगे यांनी माळी समाजाला विधानसभेत लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, वंचित बहुजन आघाडीने त्या प्रमाणातच तिकिटे द्यावीत अशी आग्रही मागणी केली. प्रस्थापित माळी समाजाच्या नेत्यांनी आजपर्यंत माळी समाजासाठी कोणते ठोस कार्य केले नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर सचिन माळी यांनी केले. सभेसाठी सातारा, सोलापूर, पुणे, नांदेड , औरंगाबाद, अहमदनगर आदी भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अरण येथे आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शीतल साठे यांचा शाहिरी जलशाचा कार्यक्रम उपस्थितांची दाद मिळवून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर