शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

दुष्काळात तरी एफआरपी वेळेत द्यावी : मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 6:19 PM

शुगर केन कंट्रोल ऱ्यां  ऊस उत्पादकांना गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देगाळप सुरु होऊन दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या हाती पैसे नाहीत शेतकऱ्यांची थकबाकी असतानाही जवळपास ६३ साखर कारखाने विना परवाना सुरु राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून शेती व शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती

पुणे : गाळप हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटल्यानंतरही राज्यातील ऊस उत्पादक शेतकयांना बहुतांश कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम दिलेली नाही. काही कारखान्यांची मागील काही वर्षांची एफआरपी देखील थकीत आहे. यावर्षी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. अशा अडचणीच्या काळात तरी शेतकऱ्यांना वेळेवर उसाची रक्कम मिळावी अशी मागणी राज्याच्या ऊस दर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठल पवार, शिवानंद दरेकर यांनी केली आहे. शुगर केन कंट्रोल ऱ्यां  ऊस उत्पादकांना गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. राज्यातील अनेक कारखाने त्याचे पालन करताना दिसत नाही. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलाला असून शेती व शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे. काही बँका आणि कारखाने देखील ऊस बिलातून वीज बिल आणि बँक थकबाकीची कपात करीत आहेत. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कोणतीही कपात करु नये, सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा करावी, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची थकबाकी असतानाही जवळपास ६३ साखर कारखाने विना परवाना सुरु आहेत. तर, काही साखर कारखान्यांचे चेअरमन, अध्यक्ष, एमडी यांनी चुकीची कागदपत्रे सादर करुन गाळप परवाने मिळवलेले आहेत, याची चौकशी करावी, असे निवेदनात म्हटले आहे. अनेक साखर कारखान्यांचे वजन काटे सदोष आहेत. मात्र, साखर आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाच्या भरारी पथकामार्फत प्रभावी कारवाई केली जात नाही. या शिवाय गेल्या आठ ते नऊ वर्षांपासुन थकबाकीदार असलेल्या कारखान्यांचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री, सहकारमंत्री, ऊस दर नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार