शहरं
Join us  
Trending Stories
1
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
2
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
3
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
4
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
5
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
6
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
7
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
8
राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक, दमदार लूक समोर
9
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित
10
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
11
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
12
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
13
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
14
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
15
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
16
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
17
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
18
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
19
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
20
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली

"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 1:20 PM

Lok Sabha Elections 2024 : भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? तर याचे साधे कारण म्हणजे चांगला हेतू, चांगली धोरणे आणि देशभक्ती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मिर्झापूर : लोकसभा निवडणुकीसाठी देशात सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून आता सातवा टप्प्यातील मतदान बाकी आहे. शेवटच्या सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

समाजवादी पार्टी सरकारच्या काळात जनता भयभीत होती, आता भाजपा सरकारमध्ये माफिया थरथरत आहेत. मतदानाच्या सहा टप्प्यांत तिसऱ्यांदा देशात मजबूत भाजपा-एनडीए सरकारचे पक्के झाले. भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय का घेतला? तर याचे साधे कारण म्हणजे चांगला हेतू, चांगली धोरणे आणि देशभक्ती, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

5 वर्षात 5 पंतप्रधान होतील, असे समाजवादी पार्टी, काँग्रेस असलेली इंडिया आघाडी सांगत आहे. मात्र, असं कुणी करतं का? कुणी मेकॅनिकही बदलत नाही. हे लोक तर पंतप्रधान बदलायला चालले आहेत. जिथे पंतप्रधान आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त असतील, तिथे ते काय काम करणार? बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?  इंडिया आघाडीच्या लोकांना देशातील जनतेने चांगलेच ओळखले आहे. हे लोक जातीयवादी, अतिपरिवारवादी आहेत. जेव्हा जेव्हा त्यांचे सरकार बनते, तेव्हा हे लोक याच आधारावर निर्णय घेतात, असे म्हणत नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

कायदा आणि सुव्यवस्था आणि समाजवादी पार्टीचा छत्तीसचा आकडा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जे दहशतवादी पकडले गेले त्यांनाही हे समाजवादी पार्टीचे लोक सोडायचे. यात नाराजी दाखवणाऱ्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला समाजवादी पार्टीच्या सरकारने निलंबित केले. त्यांनी संपूर्ण यूपी आणि पूर्वांचलला माफियांचे सुरक्षित आश्रयस्थान बनवले होते. जीवन असो किंवा जमीन, कधी हिसकावून घेतली जाईल हे कोणालाच माहीत नव्हते आणि समाजवादी पार्टी सरकारमध्येही माफियांना व्होट बँकेनुसार पाहण्यात आले होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

इंडिया आघाडीला एससी-एसटी-ओबीसी आरक्षण लुटायचे आहे - नरेंद्र मोदीआपल्या देशाची पवित्र राज्यघटनाही इंडिया आघाडीच्या निशाण्यावर आहे. त्यांना एससी-एसटी-ओबीसी आरक्षण लुटायचे आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे आपले संविधान स्पष्टपणे सांगते. 2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तेव्हा समाजवादी पार्टीने आपल्या जाहीरनाम्यात दलित आणि मागासवर्गीयांना ज्याप्रमाणे आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांनाही आरक्षण दिले जाईल, असे म्हटले होते. यासाठी राज्यघटना बदलू असेही समाजवादी पार्टीने म्हटले होते. पोलीस आणि पीएसीमध्येही मुस्लिमांना 15 टक्के आरक्षण देण्याची घोषणा समाजवादी पार्टीने केली होती. आपली व्होट बँक खूश करण्यासाठी हे लोक एससी-एसटी-ओबीसींचे हक्क कसे हिरावून घेत होते? असे म्हणत नरेंद्र मोदींनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीmirzapur-pcमिर्जापुर