शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये गॅस्ट्रोचा बळी

By admin | Updated: September 16, 2014 22:47 IST

17 लोकांना गॅस्ट्रो (कॉलरा)ची लागण झाली असून वाळू लक्ष्मण वड या दहा वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.

हुसेन मेमन ल्ल जव्हार
विहीरीतील दूषीत पाण्यामुळे दोन दिवसांतया तालुक्यातील नांदगाव पैकी राजेवाडी या पाडय़ातील   एकूण 17 लोकांना गॅस्ट्रो (कॉलरा)ची लागण झाली असून वाळू लक्ष्मण वड या दहा वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
नांदगांव पैकी राजेवाडी या पाडय़ातील रहिवासी या विहिरीतील दूषीत पाणी पित आहेत. या विहिरीच्या जवळच शेणाचा गोठा आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोठय़ातील शेणाचे दूषीत पाणी हे विहिरीत गेल्यामुळे विहिरीचे पाणी दुषीत झाले. त्यामुळे ते प्यायल्याने  रविवारी 4 रूग्ण, तर सोमवारी रोजी 13 रूग्णांना गॅस्ट्रोची लागण लागली.  जंतूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे लगेचच रूग्णांना उलटी जुलाब सुरू झाले. त्यामुळे त्यांना नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र रूग्णांची परिस्थिती बिकट होत असल्यामुळे त्यांना जव्हारच्या कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी वाळू लक्ष्मण वड वय - 1क् या मुलाला तेथून आणत असतांना रस्त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. या घटनेमुळे संपूर्ण राजेवाडी परिसरात घबराट माजली आहे. 
तसेच वाळू लक्ष्मण वड याचे शवविच्छेदनाच्या अहवालात रेस्पीरेशन न्यूमोनिआ असल्याचे सिध्द झाल्यामुळे त्याचा मृत्यू हा गॅस्ट्रोमुळे झालेला नाही, तसेच इतर एकूण 15 रूग्णांना गॅस्ट्रोची लागण झालेली आहे. परंतू वेळीच उपचार झाल्याने या रूग्णांची परिस्थिती बरी आहे. असे जव्हार कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगीतले.  
अतिरीक्त आरोग्य अधिकारी जव्हार यांचे कडून राजेवाडी येथे मेडीकल चेक अप कॅम्प लावण्यात आला असून घरोघरी जाऊन रूग्णांची विचारपूस केली जात आहे. या करीता  आंगणवाडीमध्ये 24 तास एक मेडीकल ऑफिसर, व सव्रेक्षणासाठी 5 कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही लागण पसरणार नाही, व रूग्णांच्या आकडय़ात वाढ होणार नाही याची काळजी घेण्यात येईल अशी माहिती अतिरीक्त आरोग्य  अधिकारी डॉ. आर. पी. पाटील यांनी दिली.परत एकदा राजेवाडीतील आदिवासी बांधवांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावाच्या विकासाच्या व सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परीषद , पंचायत समिती मार्फत ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात येते, व त्यांना गावातील समस्यां जाणून आणि शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविलेले असते. परंतु ते व्यवस्थित पार पाडले जात नाही. म्हणूनच अशा साथी पसरतात.