शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस महासंचालकांच्या दरबारात बदल्यांचा खेळ

By admin | Updated: June 23, 2014 01:10 IST

राज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फाईलीतच अडकले आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील

स्वेच्छा बदलीचे अर्ज फाईलीत राजेश निस्ताने - यवतमाळराज्याचे पोलीस महासंचालक ‘स्वच्छ’ असले तरी त्यांच्या कार्यालयातही बदल्यांचा खेळ सुरू आहे. एकीकडे स्वेच्छेने बदल्या मागणाऱ्या अधिकाऱ्यांचे विनंती अर्ज फाईलीतच अडकले आहेत. तर दुसरीकडे राजकारणातील आबा-दादा-भाऊ-साहेब यांच्या एका फोनवर नियमावली गुंडाळून ठेवत बदल्यांचे आदेश फिरविले जात आहेत.सुरुवातीला ताठर भूमिका घेणाऱ्या महासंचालक कार्यालयाने आता सरकारपुढे नमते धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. मुलांचे शिक्षण, स्वत:चा आजार, पत्नी, आई-वडिलांचा आजार, कौटुंबिक अडचणी यामुळे अनेक अधिकारी ठाणेदारकी, वरकमाईची ‘की-पोस्ट’ सोडून नियंत्रण कक्षात अथवा साईड ब्रँचला नोकरी करण्यास तयार आहेत.त्यासाठी त्यांनी आपल्या पोलीस प्रमुखामार्फत महासंचालकांना विनंती अर्जही पाठविले. परंतु महासंचालक कार्यालयातील कनिष्ठ यंत्रणा हेतुपुरस्सर हे अर्ज दडपून ठेवत आहेत.तर दुसरीकडे बदलीचा कायदा आणि नियमावली गुंडाळून सर्रास पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यासाठी कक्ष अधिकारी व लिपिकवर्गीय यंत्रणा मोठी ‘उलाढाल’ करीत आहे. राजकारणातील बड्या नेत्यांच्या नावाने पीए मंडळी आयपीएस अधिकाऱ्यांना फोन करतात, अप्रत्यक्ष धमकावतात आणि पाहिजे त्या अधिकाऱ्याची सोईच्या ठिकाणी नियुक्ती करून घेतात. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झालेले डझनावर अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात सहज सापडतील, अशी स्थिती आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास आपल्या अधिनस्त अनेकांवर कारवाईची वेळ महासंचालक कार्यालयावर येणार आहे. हे आणखी काही पुरावे -नाशिक रोडवरून आलेल्या एका पोलीस निरीक्षकाला नागपूर ग्रामीणच्या वाहतूक शाखेचे प्रमुख बनविण्यात आले. त्यासाठी सोलापूरच्या पीएने थेट मॅडमला फोन फिरविला. विशेष असे, एका बिल्डरच्या तक्रारीवरून हा निरीक्षक व तीन पोलीस शिपायांवर नाशिक शहरात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्यात ते ४० दिवस न्यायालयीन कोठडीत होते. -न्एक पोलीस निरीक्षक ७ जून २००६ पासून सलग नागपूर ग्रामीणमध्ये सेवा देत आहेत.-एक पोलीस निरीक्षक पाच ते सहा वर्षांपासून नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत आहेत. नरखेडला मार्गावर असताना आजाराची कारणे देऊन त्यांनी साईड पोस्टिंग मागितली होती. आता कदाचित आजार सुधारल्याने की काय त्यांनी कळमेश्वर रोडवर ठाणेदारकी स्वीकारली. -नाशिक ग्रामीणहून बदलून आलेले एक निरीक्षक राजकीय संबंधावर उमरेडमध्ये ठाण मांडून आहेत. ते आपली दादा-आबाशी सलगी असल्याचे जाहीररीत्या सांगतात.