शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचे खच्चीकरण करण्याचा डाव -नारायण राणे

By admin | Updated: September 25, 2014 09:22 IST

रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे तीन विभाग केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिल्लीला हलविले असून मुंबईचे आर्थिक महत्त्व खच्चीकरण करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे, असा आरोप उद्योग मंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी आज पत्रपरिषदेत केला. या निर्णयामुळे मुंबईतील व्यवसाय स्थलांतरित होतील, अशी भीती व्यक्त करून राणे म्हणाले की, हे विभाग मुंबईत परत आणले नाहीत तर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. मुंबई पोर्ट ट्रस्टची ७५ हजार कोटी रुपये किमतीची जागा एका बड्या उद्योगपतीला केमिकल पार्कच्या रुपाने देण्याचे आणि पोर्ट ट्रस्टच्या गतिविधी गुजरातमधील पोर्ट ट्रस्टकडे वळविण्याचे घाटत आहे. (विशेष प्रतिनिधी) मुंबई केंद्रशासित करण्याचा डावमुंबईचे महत्त्व कमी करतानाच ती केंद्रशासित करण्याचा केंद्राचा डाव आहे. चीनच्या पंतप्रधानांना देशाची आर्थिक राजधानीत मुंबईत न आणता गुजरातमध्ये नेण्यात आले. गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीला २०० कोटी रुपये केंद्राने दिले पण छत्रपती शिवरायांच्या मुंबईतील स्मारकासाठी एक छदामही दिला नाही, असा आरोप राणे यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असे होऊ दिले नसते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.-----रिझर्व्ह बँकेने १५ जुलै २०१४ रोजी परकीय गुंतवणूक विभाग व या अंतर्गत असलेले लायझनिंग, अनिवासी भारतीयांचा परदेशी बँकिंग विभाग व अचल मालमत्ता विभाग हे तिन्ही विभाग मुंबईत असलेल्या बँकेच्या मुख्यालयातून दिल्लीतील विभागीय कार्यालयात हलविले आहेत. दिल्लीत पार्लमेंट स्ट्रीटवरील रिझर्व्ह बँकेच्या इमारतीत हा विभाग हलविण्यात आला असून, या सर्व विभागाचे कामकाज हाताळण्यासाठी पी. श्रीराम यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. ------रिझर्व्ह बँकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक विभागांमध्ये 'व्हर्टिकल हेड्स' नेमण्याची प्रक्रिया सुरू असून, नोटा छापण्यापासून अनेक महत्वाच्या कामांचे आऊटसोर्सिंग होत आहे. परदेशी व्यवहारासारखा विभाग दिल्लीत हलविण्यामागचा तर्क स्पष्ट व्हायला हवा. - विश्वास उटगी, सरचिटणीस, आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन.