शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

चौदा लाख शेतकरी वंचित

By admin | Updated: March 30, 2015 02:19 IST

पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने

पावसाने दगा दिल्यामुळे दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचा हात दिला खरा; पण राज्यातील सुमारे १४ लाख शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते़ तर दुष्काळग्रस्तांसाठीचा सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी विविध कारणांनी शासनाकडे परत गेला आहे़ एकाच सातबारावर अनेकांची नावे असणे, शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक न मिळणे आदी मदत मिळण्यात अडथळे ठरल्याची कारणे पुढे केली जात आहेत़ बँक खात्याचा आग्रह न धरता लाभार्थी शेतकऱ्यांच्या हातावर थेट मदत टेकवता आली असती़, पण सरकारी यंत्रणेने परिपत्रकातील परिभाषेनुसार ‘कर्तव्य’ पार पाडले़ दुष्काळग्रस्तांना मदत दिल्याची घोषणा करून सरकारने ढोल पिटले, पण लाखो शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोचलीच नाही़ मदत निधीच्या वाटपातील ‘दुष्काळ’ संपणार कधी, असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातील दुष्काळग्रस्तांसाठी दिलेली मदत किती शेतकऱ्यांपर्यंत पोचली आणि शासनाचा उद्देश सफल झाला का याचा घेतलेला हा धांडोळा़..