शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणणार अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा योजना

By admin | Updated: December 24, 2014 02:27 IST

राज्यातील जनतेला अन्नाविषयी साक्षर करून सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास ‘अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा’ योजना राबविण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील जनतेला अन्नाविषयी साक्षर करून सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास ‘अन्न साक्षरता व अन्न सुरक्षा’ योजना राबविण्यात येणार आहे. सुरक्षित अन्न पुरवठा करणे ही अन्न व्यावसायिकांची जबाबदारी असून अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे मत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले.दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी व दूधाचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्यासाठी आयुक्त भापकर यांनी मंगळवारी दुपारी प्रशासनाच्या मुख्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातून दूध व दुग्धजन्य पदार्थांचे ४०० अन्न व्यावसायिक, डेअरीचे अध्यक्ष, चिलिंग प्लाँट, प्रक्रिया केंद्रे मुख्य, वितरक इत्यादी उपस्थित होते. राज्यात सुरू होणाऱ्या योजनेतंर्गत ग्राहक, विद्यार्थी, महिलांना अन्न सुरक्षेबाबत साक्षर केले जाणार आहे. छोटे अन्न व्यावसायिक, पदार्थांचे विक्रेते, किरकोळ विक्रेते, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे विक्रेते, अन्न सेवा पुरवणारे शासकीय सेवेतील अधिकारी, शालेय पोषण आहार यांची जनजागृती करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दूध भेसळीबाबत कठारे कार्यवाहीचे आदेश असल्याचे विषद करून प्रशासनसुद्धा याबाबत कार्यवाही करणार असल्याचे प्रशासनाचे सह आयुक्त (दक्षता) ज्ञानेश्वर फडतरे यांनी सांगितले. एफडीए व पोलीस यंत्रणा यांच्या मध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. दूध भेसळीबाबत ग्राहकांनी कुठे संपर्क साधावा याबाबत उपाययोजना करावी, असे ग्राहक पंचायतच्या डॉ. शुभदा चौकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)