शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दांडीमुळे शेतक:यांची कोंडी

By admin | Updated: June 19, 2014 22:28 IST

रिमझीम पाऊस धारांचा वर्षाव तोही मोजकाच, मान्सूनने सध्या चक्क दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पेण : मान्सून सध्या लहरी अवस्थेत पडत आहे. ना बेडकांचा डराव डराव ना, आभाळात ढगांची गर्दी, स्वच्छ कोरडे निरभ्र आभाळ अन् मध्येच कधीतरी रिमझीम पाऊस धारांचा वर्षाव तोही मोजकाच, मान्सूनने सध्या चक्क दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खरीप हंगामाची सुरुवात करताना खाचरामध्ये (शेतामध्ये) पाणीच साठले नसल्याने शेतक:यांना शेतीच्या कामांसाठी खोळंबावे लागत आहे. पावसाचे चित्र असेच राहिले तर मात्र खरीप हंगाम, संकटाच्या सीमारेषेवर उभा राहील अशी भीतीही शेतकरी वर्गाला सतावत आहे.
वेधशाळेने गेले तीन दिवस 48 तासात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता मात्र वेधशाळेचा फतवा मनावर न घेता लहरी मान्सूनने चक्क दांडी मारली आहे. गेले चार पाच दिवस हलक्या पावसाच्या रिमझीम सरीचा वर्षाव सोडता दिवसभर पडणारे कडक उन्हामुळे, धूळ पेरणी केलेले भाताचे राब अंकुरले असून लुकलुकणा:या हिरव्या तृणपात्यांना आभाळ पहाण्यासाठी आतुरलेले असताना पावसाने मारलेली दांडी व पडणारे कडक उन्हामुळे ही कोवळी रोपे जळून जाण्याची भीती शेतक:यांना सतावित आहे. किरकोळ पाऊसधारा आणि प्रचंड उकाडा यामुळे वातावरणातील बदल पीकपाणी व मानवी आरोग्यासही घातक ठरत आहे. या तापमानातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अतिसार, काविळीसारख्या साथीच्या रोगांना निमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. 
पावसाची लांबलेली एण्ट्री शिवार परिसर, पशुपक्षी व मानवी जीवनावर परिणाम करणारी आहे. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या वाढीस लागत असून एव्हाना पाण्याचे स्त्रोत भरणारा मान्सून लहरी झाल्याने मान्सूनअभावी सगळय़ांची अवस्था कठीण झाली आहे. (वार्ताहर) 
 
पावसाअभावी रोपे करपण्याची भीती
वडखळ :  प्रचंड उष्म्याने जिवाची लाहीलाही होत असताना रोहिणी नक्षत्र पूर्णपणो कोरडे गेले असताना मृग नक्षत्रमध्ये पावसाचे आगमन झाले. शेतीची कामे सुरु झाली. भाताचे बियाणो रुजून रोपे तयार होऊ लागली. मात्र दमदार पाऊस न झाल्याने शेतामध्ये पाणी साठले नाही व जमिनीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणीही जिरले नाही. आता तर पावसाने दडी मारल्याने रुजलेली रोपे करपण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. मात्र गेली काही वर्षे प्रस्तावित येणारे नवे प्रकल्प, समुद्रतटीय संरक्षक खारभूमी बंधारे यांची झालेली तुटफूट त्यामुळे खारे पाणी शेतामध्ये घुसून बाधित झालेली शेती, मजुरांची कमतरता, शेती उत्पन्नापेक्षा शेती करण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च याचा ताळमेळ जुळत नसतानाही आपली कर्मभूमी असलेल्या शेतीमध्ये इथला शेतकरी आनंदाने कष्ट करतो. त्याचीच परिणिती म्हणून पावसाचे चित्र हवामान अंदाज नैसर्गिक आपत्ती यांना न घाबरता रायगडकर शेतकरी खरीप तथा पावसाचे शेतीमध्ये नेहमीच आनंदाने सहभागी होतो.
या वर्षी बहुतांश शेतक:यांनी संकरित जया, र}ा, कर्जत 3, कर्जत 4, कर्जत 84, एमटी यु-1क्-1क्, सुवर्णा, कोमल, सोनल, सुमा, तुप्ती, गंगोत्री, रुपाली, वैष्णवी आदी महागडी भात बियाणो रुजून रोपे देखील तयार होऊ लागली परंतु पावसाने मध्येच दडी मारल्याने रोपांची वाढ खुंटली असून रोपे करपण्याची भीती निर्माण झाली असून पावसाची स्थिती अशीच राहिली तर दुबार पेरणीचे संकट शेतक:यांवर येणार असल्याने दुबार पेरणीसाठी बियाणो कुठून आणायचे असा प्रश्न शेतक:यां समोर पडला आहे.