शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

खोटारड्या पोलीस अधिकाऱ्यावर अखेर २० वर्षांनी खटला चालणार!

By admin | Updated: June 18, 2015 02:35 IST

लक्ष्मण महादेव सारिपुत्र या पोलीस उपनिरीक्षकाने २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असताना एका

मुंबई : लक्ष्मण महादेव सारिपुत्र या पोलीस उपनिरीक्षकाने २० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असताना एका खटल्यात खोटी साक्ष दिल्याबद्दल व खोटे पुरावे सादर केल्याबद्दल आता त्यांच्यावर सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला चालणार आहे.मालवण पोलीस ठाण्याने दाखल केलेल्या त्या खून खटल्यात सावंतवाडी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या खून प्रकरणाचा सारिपुत्र यांनी काही काळ तपासी अधिकारी या नात्याने तपास केला होता. त्या नात्याने खटल्यात त्यांना साक्षीसाठी बोलावले होते. मात्र त्या खटल्याच्या सुनावणीत सारिपुत्र यांनी खोटी साक्ष दिली व बनावट पुरावे सादर केले, असा निष्कर्ष सत्र न्यायालयाने नोंदविला व त्याबद्दल भादंवि कलम १९३ व १९४ अन्वये खटला चालविण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल केली. याविरुद्ध सारिपुत्र यांनी केलेले अपील उच्च न्यायालयात गेली २० वर्षे प्रलंबित होते व ते दाखल करून घेताना स्थगिती दिली गेल्याने सारिपुत्र यांच्यावरील खटला सुरूही होऊ शकला नव्हता. आता न्या. अभय ठिपसे यांनी अंतिम सुनावणीनंतर सारिपुत्र यांचे अपील फेटाळले. त्यामुळे खोटी साक्ष व खोटे पुरावे देण्याबद्दलचा गेली २० वर्षे अडकून पडलेला खटला आता मार्गी लागेल.न्या. ठिपसे यांनी त्या खटल्यात सारिपुत्र यांनी दिलेली साक्ष पाहिली तेव्हा त्यांना असे आढळले, की त्यांनी खोटी साक्ष व बनावट पुरावे दिल्याची स्पष्ट कबुलीच उलट तपासणीत दिली होती. एवढेच नव्हे, तर इतरही खटल्यांमध्ये पोलीस असेच करतात, अशी बढाईही त्यांनी मारली होती. यासंदर्भात न्या. ठिपसे यांनी असे नमूद केले, की सारिपुत्र यांनी दिलेली कबुली पाहता त्यांच्यावर खटला चालविण्याचा आदेश देण्यावाचून सत्र न्यायालयापुढे पर्यायही नव्हता. तसा आदेश दिला गेला नसता तर ते औचित्याला सोडून ठरले असते आणि त्याने न्यायसंस्था थट्टेचा विषय ठरून तिची अप्रतिष्ठा झाली असती. मुळात चूक कोणाची ? अंतरिम स्थगितीमुळे सारिपुत्र यांच्यावरील खटला २० वर्षे चालू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे न्या. ठिपसे यांनी नमूद केले. पण मुळात खोटी साक्ष व बनावट पुरावे दिल्याची सारिपुत्र यांनीच कबुली दिली आहे, ही वस्तुस्थिती २० वर्षांपूर्वीही तशीच होती. त्यामुळे अपील दाखल करून घेताना पब्लिक प्रॉसिक्युटरने ही बाब लक्षात आणून दिली नाही, म्हणून किंवा न्यायाधीशांच्याही ती लक्षात आली नाही म्हणून स्थगिती दिली. सर्व संबंधितांनी ‘ब्रिफ’ नीटपणे वाचले असते तर मुळात स्थगितीही दिली नसती.चाणाक्ष वकिलाने घेतलेल्या उलट तपासणीत सारिपुत्र गोंधळून गेले व त्यामुळे त्यांनी अशी कबुली दिली, असा त्यांच्या वकिलाने बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्या. ठिपसे यांनी म्हटले, की सारिपुत्र यांनी गोंधळून कबुली दिली किंवा कसे हा खटल्यात विचारात घेण्याचा मुद्दा आहे व त्यांना दोषी धरायचे की नाही, हे ठरविताना तो विचारात घेता येईल. पण कबुली दिली होती ही वस्तुस्थिती असल्याने मुळात त्यांच्यावर खटलाही चालवायला नको, असे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे.