शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचं कामच केलं नाही; संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 14:12 IST

मविआतील जागावाटपाबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीत चांगला, त्यांनी पैशावर जागा जिंकल्या असा आरोप संजय राऊतांनी केला. 

 नाशिक - शिवसेना २१ जागा लढली, त्यातील काही जागा, सांगलीतील जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादीने कामच केले नाही. त्यामुळे आम्ही २० जागाच लढलो, ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा आमच्याविरोधात काम करत होती. केंद्राकडून सगळ्यात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले, त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे स्ट्राईक रेट हा विषय कोणी ठेवू नये. आम्ही तिघे एकत्रित लढलो आणि तिघांचा एकत्रित स्ट्राईक रेट चांगलाय असं विधान खासदार संजय राऊत यांनी करत काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाला सूचक इशारा दिला आहे. नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. त्यामुळे २८९ जागा कुणी घेऊ शकत नाही. आम्ही तिघे एकत्रित बसू आणि जागावाटपावर चर्चा करू. लोकसभेत अनेक जागांवर गैरसमजाने मतदान झाले. राज्यातील लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केले. लाखो मते बनावट शिवसेनेला गेली. मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीचा चांगला आहे. पैशाने स्ट्राईक रेट वापरून त्यांनी जागा जिंकल्या.मुंबईच्या जागेवर स्ट्राईक रेटवाल्यांनी दरोडा टाकला. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या गेल्यात असा आरोप त्यांनी केला.

तसेच महाविकास आघाडीची उद्या बैठक नाही. बैठक होती,परंतु महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेते दिल्लीत आहेत. जागावाटपावर अजून चर्चा झाली नाही. शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. १० जागा ते लढले त्यातील ८ जागा जिंकल्या हे खरे आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रात १०० च्या वर जागा आहेत ज्या भाजपा ५०० ते १५०० या फरकाने जिंकला आहे. त्यातील बहुसंख्य जागा प्रशासनावर दबाव आणून विजयी करून घेतल्या. धुळ्याची जागा विजयी घोषित करावी असा दबाव केंद्राचा तिथल्या प्रशासनावर होता. शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली. ६० ईव्हीएम मशिनची मोजणी बाकी असताना विजयी घोषित करा यासाठी भाजपा नेते प्रयत्नात होते. धुळ्याची जागा भाजपा लुटण्याच्या प्रयत्नात होती परंतु काँग्रेसच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि काँग्रेस जिंकली. अशाप्रकारे १०० च्यावर जागा मोदी-शाह यांच्या भाजपानं ओरबडल्या आहेत. हे सरकार अस्थिर आहे. ज्यादिवशी हे सरकार कोसळेल तेव्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीsangli-pcसांगली