शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आमचं कामच केलं नाही; संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 14:12 IST

मविआतील जागावाटपाबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीत चांगला, त्यांनी पैशावर जागा जिंकल्या असा आरोप संजय राऊतांनी केला. 

 नाशिक - शिवसेना २१ जागा लढली, त्यातील काही जागा, सांगलीतील जागेवर काँग्रेस-राष्ट्रवादीने कामच केले नाही. त्यामुळे आम्ही २० जागाच लढलो, ठाणे, कल्याण डोंबिवलीत संपूर्ण शासकीय प्रशासकीय यंत्रणा आमच्याविरोधात काम करत होती. केंद्राकडून सगळ्यात जास्त टार्गेट आम्हाला करण्यात आले, त्याचा फटका आम्हाला बसला. त्यामुळे स्ट्राईक रेट हा विषय कोणी ठेवू नये. आम्ही तिघे एकत्रित लढलो आणि तिघांचा एकत्रित स्ट्राईक रेट चांगलाय असं विधान खासदार संजय राऊत यांनी करत काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाला सूचक इशारा दिला आहे. नाशिक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. त्यामुळे २८९ जागा कुणी घेऊ शकत नाही. आम्ही तिघे एकत्रित बसू आणि जागावाटपावर चर्चा करू. लोकसभेत अनेक जागांवर गैरसमजाने मतदान झाले. राज्यातील लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केले. लाखो मते बनावट शिवसेनेला गेली. मुख्यमंत्र्यांचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीचा चांगला आहे. पैशाने स्ट्राईक रेट वापरून त्यांनी जागा जिंकल्या.मुंबईच्या जागेवर स्ट्राईक रेटवाल्यांनी दरोडा टाकला. आमच्या काही जागा हातातोंडाशी आलेल्या गेल्यात असा आरोप त्यांनी केला.

तसेच महाविकास आघाडीची उद्या बैठक नाही. बैठक होती,परंतु महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेते दिल्लीत आहेत. जागावाटपावर अजून चर्चा झाली नाही. शरद पवारांचा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. १० जागा ते लढले त्यातील ८ जागा जिंकल्या हे खरे आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रात १०० च्या वर जागा आहेत ज्या भाजपा ५०० ते १५०० या फरकाने जिंकला आहे. त्यातील बहुसंख्य जागा प्रशासनावर दबाव आणून विजयी करून घेतल्या. धुळ्याची जागा विजयी घोषित करावी असा दबाव केंद्राचा तिथल्या प्रशासनावर होता. शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली. ६० ईव्हीएम मशिनची मोजणी बाकी असताना विजयी घोषित करा यासाठी भाजपा नेते प्रयत्नात होते. धुळ्याची जागा भाजपा लुटण्याच्या प्रयत्नात होती परंतु काँग्रेसच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि काँग्रेस जिंकली. अशाप्रकारे १०० च्यावर जागा मोदी-शाह यांच्या भाजपानं ओरबडल्या आहेत. हे सरकार अस्थिर आहे. ज्यादिवशी हे सरकार कोसळेल तेव्हा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर पहिली कारवाई होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीsangli-pcसांगली