शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्राणी रक्षण मंडळाची स्थापना करणार

By admin | Updated: June 5, 2015 01:16 IST

गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्याची ओरड काहींनी सुरू केली होती.

अकोला : गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्याची ओरड काहींनी सुरू केली होती. यावर उपाय म्हणून गोवंशाच्या सेवेसाठी प्राणी रक्षण मंडळांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्पाच्यावतीने आयोजित अभिनंदन सोहळ्यात ते बोलत होते. सरकारने मतांचे राजकारण न करता राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. गोवंश वाचेल तरच शेतकरी आणि समाज वाचणार असल्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गोशाळा आणि गोसेवकांचे जाळे तयार करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले. राज्य सरकारच्या निर्णयाला काहींनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केला; मात्र उच्च न्यायालयानेदेखील शासन निर्णयाला स्थगिती न देता कायद्याचे समर्थन केले. डॉ. आंबेडकरांनी संविधानात गोवंशाचे रक्षण करण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर निश्चित केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या कायद्याचा धर्माशीदेखील संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. ही खेदाची बाब आहे.राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यानंतर इंग्रजी मीडियातून सरकारने मांसविक्रीवर निर्बंध घातल्याचे वृत्त झळकत होते. आमचा उद्देश गोवंशाची हत्या रोखण्याचा असताना संबंधित मीडियाची भूमिका असंवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.