शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 12:22 IST

Sanjay Raut on Eknath Shinde, Narendra Modi, Ajit pawar: काही भटकते आणि वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, संजय राऊतांची मोदींवर टीका.

महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत राज्यावर अनेकांची, व्यापारांची वक्रदृष्टी कायम राहिलेली आहे. ती आज सुद्धा आहे. दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे. काही भटकते आणि वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केले जात असल्याची टीका ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

शिवसेना जोपर्यंत इकडे ठामपणे उभी आहे तोपर्यंत यांना ते शक्य नाही म्हणून या लोकांनी शिवसेना तोडली. शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे महाराष्ट्राच्या  स्वाभिमानासाठी ठामपणे उभे राहतील आणि लढत राहतील, असे राऊत म्हणाले. 2024 ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत अजित पवारांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदलेला असेल, असा टोला राऊत यांनी लगावला. 

आजच्या महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता या परिस्थितीचा विचार करत आहे. मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि 107 हुतात्मा यांचे स्मारक जे फोर्ट ला आहे हे सुद्धा पाहुन यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. 

महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते याची औरंगजेबाची कबर आणि 107 हुतात्मा यांचे स्मारक दोन्ही प्रतीके आहेत. सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती यापूर्वी अशी नव्हती. महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीच झुकला नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत. त्याला थैलीचे राजकारण म्हणतात, असा आरोप राऊत यांनी केला. 

तसेच शिवसेना फडणवीस गट बारा-तेरा जाग लढवत आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना सातत्याने  21 , 22 जागा लढत आलेली आहे. 22 वी जागा होती, ती उत्तर मुंबईची जागा आम्ही काँग्रेसला दिली. शिवसेना फडणवीस गट १२-१३ जागा लढवत आहे. याला लोटांगन घालणे म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाही आणि अनेक ठिकाणी जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरवले किंवा कापले ही काही स्वाभिमानाची गोष्ट नाही ही एक लाचारी आहे, अशी टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४