शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
2
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
3
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
6
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
7
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
8
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
9
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
10
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
11
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
12
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
13
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
14
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
15
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
16
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
17
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
18
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
19
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
20
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
Daily Top 2Weekly Top 5

परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 12:22 IST

Sanjay Raut on Eknath Shinde, Narendra Modi, Ajit pawar: काही भटकते आणि वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, संजय राऊतांची मोदींवर टीका.

महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून सतत राज्यावर अनेकांची, व्यापारांची वक्रदृष्टी कायम राहिलेली आहे. ती आज सुद्धा आहे. दिल्लीवरून मोदी आणि शहा यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांवर पडलेली आहे. काही भटकते आणि वखवखते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत, महाराष्ट्राच्या हक्काचे अधिकाराचे लचके तोडत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला कमजोर केले जात असल्याची टीका ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

शिवसेना जोपर्यंत इकडे ठामपणे उभी आहे तोपर्यंत यांना ते शक्य नाही म्हणून या लोकांनी शिवसेना तोडली. शरद पवार यांचा पक्ष तोडून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. पण या वेळेला काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे महाराष्ट्राच्या  स्वाभिमानासाठी ठामपणे उभे राहतील आणि लढत राहतील, असे राऊत म्हणाले. 2024 ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत अजित पवारांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदलेला असेल, असा टोला राऊत यांनी लगावला. 

आजच्या महाराष्ट्र दिन महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता या परिस्थितीचा विचार करत आहे. मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहून यावी आणि 107 हुतात्मा यांचे स्मारक जे फोर्ट ला आहे हे सुद्धा पाहुन यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. 

महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते याची औरंगजेबाची कबर आणि 107 हुतात्मा यांचे स्मारक दोन्ही प्रतीके आहेत. सध्याच्या महाराष्ट्राची परिस्थिती यापूर्वी अशी नव्हती. महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीच झुकला नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत. त्याला थैलीचे राजकारण म्हणतात, असा आरोप राऊत यांनी केला. 

तसेच शिवसेना फडणवीस गट बारा-तेरा जाग लढवत आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना सातत्याने  21 , 22 जागा लढत आलेली आहे. 22 वी जागा होती, ती उत्तर मुंबईची जागा आम्ही काँग्रेसला दिली. शिवसेना फडणवीस गट १२-१३ जागा लढवत आहे. याला लोटांगन घालणे म्हणतात, असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्ही तुमच्या जागा कायम ठेवू शकला नाही आणि अनेक ठिकाणी जे उमेदवार भारतीय जनता पक्षाने ठरवले किंवा कापले ही काही स्वाभिमानाची गोष्ट नाही ही एक लाचारी आहे, अशी टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४