शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वामित्व’ संपल्याने दुर्मीळ ग्रंथांची लयलूट!

By admin | Updated: January 18, 2015 01:09 IST

मरणोपरांत साठी ओलांडलेल्या लेखकांची पुस्तके ‘स्वामित्व हक्क’ कायद्यातून सुटल्याने आता कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत.

नरेंद्र रानडे ल्ल सांगली मरणोपरांत साठी ओलांडलेल्या लेखकांची पुस्तके ‘स्वामित्व हक्क’ कायद्यातून सुटल्याने आता कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत. मागील काही महिन्यांपासून मराठी पुस्तक विश्वात सुरू असलेल्या ‘किंमत युद्धा’मागे हेच कारण आहे. मात्र हे युद्ध वाचकांसाठी पर्वणीच ठरत आहे.ज्या लेखकांच्या निधनाला साठ वर्षे होऊन गेली आहेत, त्यांची पुस्तके ‘स्वामित्व हक्का’च्या (कॉपीराईट) कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने ती छापण्याची मुभा कोणत्याही प्रकाशकास मिळाली आहे. त्यामुळेच नामवंत लेखकांच्या साहित्यकृतींच्या किमतीवरून चढाओढ सुरू झाली असून, सध्या साने गुरुजी, ना.सी. फडके, लक्ष्मीबाई टिळक, ह.ना. आपटे, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर आदी लेखकांच्या पुस्तक विक्रीमध्ये हे युद्ध पाहायला मिळते.‘किंमत युद्ध’ नसतानाही साहित्य संमेलनांतील ग्रंथ प्रदर्शनात पुस्तक विक्रीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. त्यात सामान्यांना न परवडणाऱ्या ‘बेस्ट सेलर्स’चा वाटा मोठा होता. हल्ली साहित्य संमेलनांशिवायही भरणाऱ्या विविध ग्रंथ प्रदर्शनांतून पुस्तके सहजपणे वाचकांच्या हाती जाऊ लागली आहेत. ‘किंमत युद्धा’मुळे साहित्य संमेलनांतील प्रदर्शनात आणि अशा ग्रंथ प्रदर्शनांत कमी किमतीत मिळणाऱ्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे.एकाच लेखकाचे पुस्तक सध्या विविध प्रकाशकांमार्फत विक्रीस उपलब्ध आहे.एका लेखकाचे एखादे पुस्तक जर ५० रुपयांत विक्रीस उपलब्ध असेल, तर तेच पुस्तक दुसऱ्या प्रकाशकातर्फे २०० ते २५० रुपये या किमतीतही उपलब्ध आहे. साने गुरुजी, ना.सी. फडके, लक्ष्मीबाई टिळक, ह.ना. आपटे, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर या नामवंतांची पुस्तके कमी किमतीत उपलब्ध झाली आहेत. ‘किंमत युद्धा’मुळे अडीचशे ते चारशे पानांची पुस्तकेही ३० ते ५० रुपयांत उपलब्ध आहेत.पुस्तक विश्वात स्पर्धा नकोपुस्तक विश्वात सुरू असलेले ‘किंमत युद्ध’ योग्य नाही. थोर लेखकांच्या पुस्तकांच्या छपाईचा दर्जा चांगलाच असला पाहिजे. अक्षराचा आकार, कागदाचा प्रकार, पुस्तक बांधणी यावर प्रकाशकाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरून ती काही वर्षांनी खराब न होता वर्षानुवर्षे वाचकांच्या घरात राहतील. टिकाऊपणाच्या मुद्द्यावर कोणती पुस्तके किती किंमत देऊन विकत घ्यायची, याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा.- सुनील मेहता, पुस्तक प्रकाशक, पुणे ‘किंमत युद्ध’ आवश्यकपुस्तक विश्वात सुरू असलेले ‘किंमत युद्ध’ गरजेचे आहे. या प्रकारामुळे वाचकांना एकाच लेखकाचे अनेक प्रकाशकांनी छापलेले कोणते पुस्तक निवडायचे याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याच्या खिशाला परवडेल त्या किमतीत उपलब्ध असणारे पुस्तक विकत घेण्याचा पर्याय ‘किंमत युद्धा’मुळे मिळाला आहे आणि तो महत्त्वाचा आहे.- त्रिलोकनाथ जोशी, पुस्तक विक्रेते, सांगली