शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

घोलप यांचे राजकारण संपुष्टात

By admin | Updated: August 23, 2014 00:07 IST

शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य व माजी मंत्री बबनराव शंकर घोलप यांना अपात्र घोषित करणारा आदेश राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी जारी केला आहे.

नाशिक : भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्षाचा कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा झालेले शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य व माजी मंत्री बबनराव शंकर घोलप यांना अपात्र घोषित करणारा आदेश राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी जारी केला आहे. 
यामुळे घोलप यांचे सध्याचे आमदारपद 21 मार्च 2क्14 पासून  पूर्वलक्षी परिणामाने संपुष्टात आले आहे. एवढेच नव्हे, तर भविष्यात त्यांना राज्य विधिमंडळाची कोणताही निवडणूक लढविता येणार नसल्याने त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात आले आहे. राज्यपालांचा हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या 28 जुलैच्या असाधारण राजपत्रत प्रसिद्ध झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या खटल्यात मुंबई येथील विशेष न्यायालयाने घोलप आणि त्यांच्या पत्नीस बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याबद्दल दोषी ठरवून 21 मार्च रोजी शिक्षा ठोठावली होती. त्यामुळे राज्यपालांनी काढलेल्या आदेशानुसार घोलप यांचे विद्यमान आमदारपद त्या दिवसापासून गेले आहे.
विशेष म्हणजे राज्यपालांनी घोलप यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 191 (1)(ई) अन्वये अपात्र घोषित केले असल्याने या अपात्रतेस कोणतीही कालमर्यादा नाही. यानुसार अपात्र ठरलेली व्यक्ती राज्य विधानसभेची निवडणूक लढविण्यास कायमची अपात्र ठरते.
भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशांनुसार विधिमंडळ सचिवालयाने घोलप यांच्या अपात्रतेचे प्रकरण राज्यपालांकडे पाठविले होते. राज्यघटनेच्या अनुच्छेद 192 (2) नुसार शिफारस व मत घेण्यासाठी राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविले होते. आयोगाने अॅडव्होकेट जनरलचे मत घेऊन अशी शिफारस केली की, शिक्षा झाल्याच्या दिवसापासून घोलप आमदार
राहण्यास अपात्र ठरले असून, त्यांची जागा त्याच दिवसापासून रिकामी झाली आहे. (प्रतिनिधी)
 
शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारमध्ये घोलप मंत्री होते. युतीची सत्ता जाताच 1999 मध्ये ‘एसीबी’ने त्यांच्यावर गुन्हा नोंदविला व 2क्क्1 मध्ये खटला दाखल केला. त्यानंतर घोलप यांनी विधानसभेच्या तीन निवडणुका लढविल्या व तिन्ही वेळा ते निवडून आले. आता 15 वर्षानी  त्यांना भूतकाळाचे कर्म भोगावे लागले.