शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही दुष्काळाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:41 IST

पावसाची दांडी : केवळ ५३ टक्के पेरण्या; पिके धोक्यात

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने गत पंधरा दिवसांपासून दांडी मारल्याने, जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत केवळ ५३ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उगवलेली पिकेही सार्वत्रिक दमदार पावसाअभावी धोक्यात आली आहेत. त्यामुळे वर्षभरानंतर यंदाही जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. जूनमध्ये अधून-मधून रिमझिम बरसलेल्या पावसानंतर जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या सुरू केल्या; परंतु गत २ जुलैनंतर पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात सुरू झालेल्या खरीप पेरण्या थांबल्या. जिल्ह्यात ४ लाख ८१ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले असले, तरी १२ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २ लाख ५७ हजार ४९४ हेक्टर (५३ टक्के) क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा समावेश आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील उर्वरित २ लाख २४ हजार ६ हेक्टर (४७ टक्के) क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्यापही रखडली आहे. रिमझिम पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात करण्यात आलेल्या पीक पेरणीनंतर पिके उगवली; मात्र गत पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने, उगवलेल्या पिकांनीही माना टाकल्या आहेत. सार्वत्रिक दमदार पावसाअभावी पिके धोक्यात आल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. गत २०१४ व २०१५ च्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मागील एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला, तरी जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पाऊस अद्यापही बरसला नसल्याने, यंदाही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरल्याचे चित्र आहे. या पृष्ठभूमीवर दडी मारून बसलेला पाऊस जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार हजेरी केव्हा लावणार, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.२५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी; अहवाल शासनाकडे!जिल्ह्यात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गत आठवड्यात शासनाच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही भागात दुबार तर काही भागात तिबार पेरणीचा खर्च सहन करावा लागत आहे.पावसातील खंडामुळे जिल्ह्यात २५ हजार हेक्टरवर दुबार पेरणी करण्यात आल्याचा अहवाल गत आठवड्यात शासनाकडे सादर करण्यात आला. गत तीन-चार दिवसात होत असलेल्या रिमझिम पावसामुळे धोक्यात आलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. दमदार पावसाअभावी जिल्ह्यात ४७ टक्के पेरण्या रखडल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास शेतकऱ्यांना तूर, तीळ व सूर्यफूल अशा पर्यायी पिकांची पेरणी करावी लागेल.- रवींद्र निकम, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी