शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळ, मराठवाडा कोरडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 10:52 AM

राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे.

ठळक मुद्देओला-सुका दुष्काळाचा खेळ : औरंगाबाद-अमरावती, नागपूर विभागात जेमतेम पाणी

पुणे : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती विभागांत पाण्याचा ठणठणाट असून, विदर्भातील नागपूर विभागामधे देखील पाणीबाणीची स्थिती आहे. अमरावतीमधे अवघा १८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण, पुणे आणि नाशिक वगळता राज्यातील अनेक मोठ्या धरणांत अजूनही क्षमतेच्या निम्माही पाणीसाठा झालेला नाही.मॉन्सूनचा दोन महिन्यांचा काळ लोटला तरी मराठवाडा आणि विदर्भातील धरणात पुरेसा साठा नाही.

राज्याच्या दुसऱ्या भागामधे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यामधे दोन महिन्यांतच मॉन्सूनची सरासरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील सर्वात मोठे असलेले उजनी धरण (११७.४७ टीएमसी) पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनीतून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पंढरपुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. राज्यातील एका भागामधे जलसंकट घोंगावत असून, मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर विभागात मात्र वर्षभराची पाण्याची बेगमी होईल की नाही याची चिंता आहे. जुलैच्या अखेरीपर्यंत औरंगाबाद विभागात क्षमतेच्या अवघा पाऊण टक्के साठा येथील धरणांत होता. नाशिकमधे झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडी (पैठण) धरणात क्षमतेच्या ६५ टक्के साठा झाला आहे. जवळपास ७७ टीएमसी पाणी जायकवाडीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट साठा आहे. औरंगाबाद विभागाचा विचार केल्यास तेथे क्षमतेच्या अवघा २१.९४ टक्केच साठा आहे. पैठण वगळता औरंगाबाद विभागातील बीडमधील मांजरा, हिंगोलीचे येलदरी, सिद्धेवर, नांदेडचे निम्म मनार, उस्मानाबादचा सिना, तेरणा आणि परभणीच्या दुधना प्रकल्पामधे पाण्याचा अक्षरश: खडखडाट आहे.राज्यातील विभागनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये)विभाग       एकूण          एकूण        आजचा                       टक्केवारी           उपयुक्त साठा    साठा         उपयुक्त साठाअमरावती    १४८.०६     १७६.३५      २७.३८                           १८.८औरंगाबाद    २६०.३१    ३२५.८२       ५७.११                           २१.९४कोकण        १२३.९४     १२९.६४      १०४.९९                        ८४.७१नागपूर       १६२.६७      १९७.०१       ४९.१७                        ३०.२३नाशिक       २१२            २४३.२३      १०९.६६                     ५१.७३पुणे            ५३७.१२       ६७४.९२       ४४४.७५                   ८२.८एकूण        १४४४.१३     १७१९.८२     ७९३                        ५४.९५

अमरावती विभागातही तीच स्थिती आहे. तेथे अवघा २२ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यातील वाणमधे क्षमतेच्या निम्मा, बुलडाण्याच्या पेनटाकळीमधे ४२ टक्के, यवतमाळच्या बेंबळा प्रकल्पात १८.२७ टक्के पाणसाठा आहे. या प्रकल्पातील मोठ्या प्रकल्पांमधेच पाणी नसल्याने येथेही वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द या मोठ्या प्रकल्पात ४४ टक्के पाणीसाठा असून, गोंदियातील इटियाडोहला ५१ आणि निम्न वर्धा येथे २१ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रपूरमधील ओसाळमेंढा पूर्ण क्षमतेने भरला आहे. नागपूरमधील तोतलाडोह या मोठ्या प्रकल्पात अवघा ०.१ टक्के साठा असून, विभागातील इतर ठिकाणी सरासरी पंचवीस ते तीस टक्केच पाणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसdroughtदुष्काळFarmerशेतकरीweatherहवामान