शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

लस टोचून घेण्याची घाई करणार नाही, देशातील ६१ टक्के लोक म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 08:50 IST

कोरोना प्रादुर्भाव अनेकांच्या अंगवळणी पडला असून मार्च, २०२१ पर्यंत त्या निर्बंधांसह जीवन जगू शकतो, असे ६३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, हे निर्बंध असह्य झाले असून त्यामुळे प्रचंड निराश आणि अस्वस्थ असल्याची भावना ३३ टक्के लोकांनी व्यक्त केली.

मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करणारी लस कधी येणार, याकडे जगाचे लक्ष लागले असले तरी ही लस उपलब्ध झाल्यानंतर ती टोचून घेण्यासाठी घाई करणार नसल्याचे मत ६१ टक्के लोकांनी मांडले.

कोरोना प्रादुर्भाव अनेकांच्या अंगवळणी पडला असून मार्च, २०२१ पर्यंत त्या निर्बंधांसह जीवन जगू शकतो, असे ६३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, हे निर्बंध असह्य झाले असून त्यामुळे प्रचंड निराश आणि अस्वस्थ असल्याची भावना ३३ टक्के लोकांनी व्यक्त केली.

भारतासह जगभरात कोरोनाला रोखणाऱ्या लसनिर्मितीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत काही चाचण्या अंतिम टप्प्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने कशी देता येईल, याबाबतचे नियोजन केंद्र सरकारनेही सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सर्वेक्षण करणाºया लोकल सर्कल या संस्थेने देशातील २५ हजार नागरिकांची मते अजमावली. त्यातून हा निष्कर्ष समोर आला.

लस घेऊनच कोरोनापूर्व काळासारखे जीवन जगता येईल, असे १२ टक्के लोकांना वाटत असून लस घेतल्यानंतरही काही महिने निर्बंधांसह जगणे पसंत करू, असे मत २५ टक्के लोकांनी व्यक्त केले. अनलॉकपूर्वी चिंताग्रस्त असल्याचे ३३ टक्के लोकांनी सांगितले.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस