शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद जरा 'रिस्की'च आहे भौ; अजितदादा इतिहास रचतात का पाहू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 14:23 IST

आजवरची परंपरा किंवा इतिहास पाहिला तर उपमुख्यमंत्री झालेले नेते मंत्री झालेत, पण मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसनं 'किंगमेकर'ची भूमिका अनेकदा पार पाडलीमुख्यमंत्रिपद हे राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं पद मानलं जातं. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांचं मंत्रिपद मिळालेले नेतेही राज्यात पाहायला मिळतात.

मुंबई - मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरुन झालेला सत्तासंघर्ष राज्याने पाहिला. भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षांनी एकत्र निवडणूक लढवली, मात्र मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षात तिढा निर्माण झाला. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही राहिली पण भाजपाने मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपाकडे सर्वाधिक जागा असूनही त्यांना सरकार स्थापन करता आलं नाही आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी नवी महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आली, सत्तेत विराजमान झाली. अगदीच अनपेक्षितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्रिपद हे राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं पद मानलं जातं. हे पद मिळविण्यासाठी अनेक नेते इच्छुक असतात. काही नशीबवान मंडळींना ते अचानक मिळून जातं, तर काहींचं स्वप्न स्वप्नच राहतं. महाराष्ट्राच्या राजकारणातही मुख्यमंत्रिपदाची 'लॉटरी' लागलेले काही नेते आहेत, तर हे सिंहासन थोडक्यात हुकलेल्या मंडळींची संख्याही बरीच आहे. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांचं मंत्रिपद मिळालेले नेतेही राज्यात पाहायला मिळतात. नारायण राणे, अशोक चव्हाण हे दोन नेते आधी मुख्यमंत्री होते आणि नंतर त्यांना महत्त्वाची खातीही मिळाली. पण, राज्यातील उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेला नेता आजपर्यंत मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर विराजमान होऊ शकलेला नाही. त्यामुळेच मोठं स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांसाठी हे पद जरा जोखमीचंच मानलं जातं.

१९७८ मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना नाशिकराव तिरपुडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. शरद पवार मुख्यमंत्री असताना सुंदरराव साळुंखे उपमुख्यमंत्री होते. १९८३ ते ८५ या काळात रामराव आदिक, १९९५ ते ९९ भाजपाचे गोपीनाथ मुंडे, १९९९ ते २००३ दरम्यान छगन भुजबळ, २००३-०४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील, २००४ ते २००८ दरम्यान आर.आर पाटील, पुन्हा २००८ ते २०१० मध्ये छगन भुजबळ, त्यानंतर २०१०-१४ मध्ये अजित पवार यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं. अलीकडेच साडेतीन दिवसांसाठी आणि आता महाविकास आघाडी सरकारच्या विस्तारात पुन्हा अजितदादांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. 

आजवरची परंपरा किंवा इतिहास पाहिला तर उपमुख्यमंत्री झालेले नेते मंत्री झालेत, पण मुख्यमंत्री होऊ शकलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 'किंगमेकर'ची भूमिका अनेकदा पार पाडली असली, तरी या 'पॉवरफुल्ल' पक्षाचा कुठलाही नेता अद्याप महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला नाही.  मागे एकदा त्यांना तशी संधी होती. परंतु, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा 'काटेरी मुकूट' काँग्रेसच्या शिरावर ठेवला होता. 

राजकारणातील योगायोग म्हणा अथवा आणखी काही, पण उपमुख्यमंत्रिपद जरा रिस्कीच आहे, हे नक्की! त्यामुळे या परंपरेला अजित पवार छेद देणार का, नवा इतिहास रचणार का, की ही परंपरा अशीच सुरू राहणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारChief Ministerमुख्यमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारChhagan Bhujbalछगन भुजबळGopinath Mundeगोपीनाथ मुंडेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार