शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

‘औद्योगिक’ गुंतवणुकीत घट, घोषणा ११ लाख कोटींची, गुंतवणूक एक लाख ९० हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:23 AM

राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असले तरी प्रत्यक्षात या क्षेत्रातील गुंतवणुकीत बरीच घट झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

- राजेश निस्तानेयवतमाळ : राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्याचे चित्र निर्माण केले गेले असले तरी प्रत्यक्षात या क्षेत्रातील गुंतवणुकीत बरीच घट झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.राज्यात ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात सुमारे ११ लाख ३७ हजार ७८३ कोटींची गुंतवणूक होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. मात्र आतापर्यंत ही गुंतवणूक अवघ्या दोन लाख ६९ हजार ८१० कोटींवर पोहोचली आहे. भाजपा सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्योगांच्या संख्येत सुमारे साडेपाचशेने घट झाली आहे. गुंतवणुकीचे प्रमाण साडेसात टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर आले आहे.‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान उद्योग खात्याशी संबंधित एकूण दोन हजार ८५० सामंजस्य करार झाले. त्यातून चार लाख १३ हजार कोटींची गुंतवणूक सरकारला अपेक्षित होती. परंतु सामंजस्य करारापैकी आतापर्यंत दोन हजार ४५६ करारांचीच प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली असून त्याद्वारे एक लाख ९० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. नोटाबंदी, जीएसटीनंतर ही गुंतवणूक घटल्याचे मानले जाते.उद्योगांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनानवनवीन उद्योग यावेत, त्यातून गुंतवणूक वाढावी यासाठी विविध योजना राबवून उद्योगांना आकर्षित केले जात आहे. उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व फॅब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती विशेष प्रोत्साहन योजना व महिला उद्योजकांसाठी धोरणे जाहीर केली आहेत. त्या माध्यमातून उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. विविध सुधारणा, एक खिडकी प्रणालीद्वारे उद्योगांना ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’ उपक्रमात समाविष्ट केले जात आहे. मात्र त्यानंतरही नव्या उद्योगांची उभारणी व गुंतवणुकीला अपेक्षित प्रतिसाद नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र