शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

कर्जमाफीसाठी ३५ लाख शेतकऱ्यांचे अर्ज, लाभार्थींची पहिली यादी आज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 3:52 AM

एप्रिलपर्यंत योजना पूर्ण करण्यात येणार

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार असून येत्या एप्रिलपर्यंत ही योजना पूर्ण केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जाहीर केले.पहिल्या यादीत प्रत्येक जिल्ह्याच्या दोन गावांमधील लाभार्थींची नावे असतील. दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होईल. आतापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांची नावे या योजनेसाठी आली आहेत. त्यांची कागदपत्रे तपासून निकषात बसणाऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. सगळ्या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आधीच्या सरकारमध्येही मी सातत्याने या लाभार्थींची नावे जाहीर करा, अशी भूमिका घेतली होती, पण ती दिली नव्हती म्हणून आम्ही आधी नावे जाहीर करीत आहोत. आमच्या योजनेत पूर्ण पारदर्शकता असेल. सरकारमध्ये येताच आम्ही योजना जाहीर केली व आता अंमलबजावणी करीत आहोत. आधीच्या सरकारने त्यासाठी सात महिने घेतले होते. ती योजना अजूनपर्यंत सुरू होती, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.तूर खरेदीत सरकारने चालढकल चालविल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा पवार यांनी इन्कार केला. आतापर्यंत ३०६ केंद्रांवर ६२ हजार ६९० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. तरीही विरोधकांनी पुरावे द्यावेत, आम्ही चौकशी करू, असे आव्हान अजित पवार यांनी दिले.

टॅग्स :Farmerशेतकरी