गेवराई (जि़ बीड) : तालुक्यातील तळवट-बोरगाव येथील शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. उत्तमराव गाडे (६०) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. गाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या शेतकऱ्यावरती महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे २ लाख रूपये कर्ज होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}