शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:09 IST

Shiv Sena Shinde Group News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला महायुतीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.

Shiv Sena Shinde Group News: पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. परंतु, या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते उत्तर देत असून, उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओच आता शेअर करण्यात आला आहे.

फेक नरेटिव्ह पसरवला जात आहे. ⁠हा पक्षाचा किंवा सरकारी कार्यक्रम होता का? हा गुजराथी समाजाचा कार्यक्रम होता. एकनाथ शिंदे हे आधी जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणाले आणि जय गुजरात, असे म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे. आमचे एक संमेलन ८ ते १० वर्षांपूर्वी कर्नाटकला होते. तिथे भाषण संपवताना शरद पवार यांनीही जय कर्नाटक अशी घोषणा दिली होती. म्हणजे शरद पवार यांचे कर्नाटकवर प्रेम आहे का? ते महाराष्ट्रातील आहेत, महाराष्ट्राबाबत त्यांना प्रेम आहे. कोणत्याही गोष्टीचे राजकीय भांडवल करताना, एखाद्या व्यक्तीला बदनाम करताना विकासात्मक दृष्ट्‍या करू. काही लोक गेल्या तीन वर्षांच्या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीत. त्यामुळेच असे मुद्दे काढत असतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली.

शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला

तसेच उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे ‘आप आगे चलो हम साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात’ म्हणत असल्याचे दिसत आहे. अनेक जण हे विसरले असतील, म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न, असे शीतल म्हात्रे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, गुजराती समाजाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे 'जय गुजरात' म्हणाले. त्यावरून एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रावरील आणि मराठी माणसावरील प्रेम कमी झाले आणि गुजरात वर जास्त प्रेम आहे, असा संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडे लावले आणि संपूर्ण भारताला स्वतंत्र केले. दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचे काम मराठी माणसाने केले. एवढा संकुचित विचार कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे