शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
5
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
6
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
7
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
8
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
9
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
10
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
11
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
12
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
13
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
14
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
15
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
16
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
17
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
18
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
19
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
20
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...

CoronaVirus News : केवळ ज्येष्ठ नव्हे; तरुणाईलाही कोरोना संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:06 AM

राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या टप्प्यावर आहे. दिवसागणिक राज्यातील स्थिती गंभीर होत असताना केवळ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे म्हटले जात होते. मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता ९० हजारांहून अधिक तरुण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे केवळ ज्येष्ठांनीच नव्हे तर तरुणांनीही अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे.तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळाच कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड ड्रग विभाग महाराष्ट्राच्या आकडेवारीनुसार, १४ एप्रिल म्हणजेच लॉकडाऊन १.० पर्यंत राज्यात ९२३ लोक पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर, ३१ मेपर्यंत कोरोनानेग्रस्त झालेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होऊन ती २६,३२५ पर्यंत पोहोचली.याविषयी, संक्रमण रोगाचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोनाच्या विळख्यात तरुणाई अडकण्याची प्रमुख दोन कारणे आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहेत. तर, दुसरे मुख्य कारण म्हणजे अनेक तरुण लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. कुटुंबातील इतर कोणी बाहेर पडू नये म्हणून तरुणच घराबाहेर पडत आहेत, यामुळे तरुणाईला होणाºया संसर्गात वाढ होताना दिसत आहे.निदान उशिरा झाल्याने वाढतो धोका!बºयाचदा ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अतिजोखमीचे आजार उद्भवतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याला अन्य आजारांचा अधिक धोका संभावतो. मात्र आता तरुणाईच्या बाबतीतही हीच स्थिती उद्भवली आहे. तरुण वयात मधुमेह, रक्तदाबाच्या तपासण्या न करणे व या समस्यांकडे दुर्लक्ष करणे तरुणाईसाठी घातक ठरत आहे.याविषयी, डॉ.ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, तरुणाईला जीवनशैलीशी निगडीत आजारांचा विळखा असतो. मात्र बºयाचदा या आजारांचे निदान होत नाही किंवा उशिराने निदान होते तोपर्यंत आरोग्याचा धोका वाढलेला असतो ही बाब लक्षात येत नाही.सध्याच्या काळात तरुणाईसह प्रत्येकाने जीवनशैली, पोषक आहार यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शिवाय, घराबाहेर पडताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस