शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

CoronaVirus News: मृतदेह बघून स्मशानही गहिवरले; अंत्यविधीसाठीही वेटिंग लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 3:08 AM

नांदेड, अहमदनगरमध्ये एकाच दिवसात ६८ मृतांवर अंत्यसंस्कार

अहमदनगर/नांदेड : राज्यात कोरोनाचा कहर वाढला असून, मृत्यूचे तांडव सुरू आहे. स्मशानभूमीही कमी पडू लागल्या असून, सामूहिक अंत्यसंस्कार  किंवा प्रतीक्षा याशिवाय पर्याय नसल्याचे विदारक  चित्र अहमदनगर आणि नांदेड येथे पाहायला मिळाले. नगर येथील स्मशानभूमीत तब्बल ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नांदेडमध्ये २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले, तर १३ मृतदेहांना अंत्यविधीसाठी प्रतीक्षा करावी लागल्याने स्मशानभूमीही गहिवरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अहमदनगरमध्ये गुरुवारी दिवसभरात ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्वजण कोरोनामुळेच दगावले. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. वर्षभरातील सर्वाधिक मृत्यू एका दिवसात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा आकडा गुरुवारी एकदम वाढला. दिवसभरात अमरधामध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ आशा ४५ जणांवर अंत्यविधी करण्यात आला. २२ मृतदेह ओट्यांवर ठेवून अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कार सहायक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूकजिल्हा शासकीय रुग्णालयातून मतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. मनपाने आणखी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेऊन वर्ष उलटले, तरी अद्याप त्यास मुहूर्त मिळालेला नाही.स्मशानभूमीची दारे बंद  कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या एकीकडे वाढत असताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मात्र स्मशानभूमींची दारे बंद झाली आहेत. शहरातील स्मशानभूमीच्या गेटला कुलूप ठोकण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी नगरपंचायतची परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फलक लावण्यात आला आहे.नांदेड : सहा तासांत २३ जणांवर अंत्यसंस्कार, १३ मृतदेह प्रतीक्षेतनांदेड महानगरपालिकेच्या वतीने गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी ८ ते २ या वेळेत तब्बल २३ मृतदेहांवर महापालिकेच्या पथकाने अंत्यसंस्कार केले, तर आणखी १३ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शांतीधाम परिसरात वेटिंगवर असल्याचे चित्र होते. शुक्रवारी शांतीधाम परिसरात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाच्या रांगा लागल्या होत्या. एकाच वेळी अनेक मृतदेहांना अग्नी दिल्याने या परिसरात धुराचा लोट उठला होता. त्यातच अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मोजक्या नातेवाइकांच्या आक्रोश आणि मृतदेह घेऊन येणाऱ्या सायरनच्या अस्वस्थ करणाऱ्या आवाजाने शांतीधाम परिसरातील वातावरण मन बधिर करून टाकणारे होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या