शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
4
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
5
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
6
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
7
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
8
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
9
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
10
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
11
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
12
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
13
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
14
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
15
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
16
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
17
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
18
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
19
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
20
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोना विषाणूच्या संक्रमणाबाबतचे समज आणि गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 07:05 IST

प्रसारमाध्यमांनी कोविड-१९ च्या संक्रमणाबाबत माहिती देऊन नागरिकांची मदत केली आहे. परंतु संक्रमणाबाबत जेवढे समज आहेत, तेवढे गैरसमजही आहेत.

- डॉ. जय देशमुख(एमडी, एफसीपीएस,एमएनएएमएस)भारतीय आरोग्य व्यवस्था आतापर्यंत कोरोना व्हायरसचा सामना चांगल्या पद्धतीने करीत आहे. परंतु चुकीच्या सूचनांमुळे समाजात दहशतीचे वातावरण आहे. कोरोना सार्वजनिक आरोग्यावरील संकट ठरले आहे. व्हायरसची उत्पत्ती, व्हॅक्सीनची उपलब्धता, विविध उपचारांचे दावे आणि त्याचा प्रसार थांबविण्यासाठी मास्कचा वापर करण्यास सांगण्यात येत आहे. प्रसारमाध्यमांनी कोविड-१९ च्या संक्रमणाबाबत माहिती देऊन नागरिकांची मदत केली आहे. परंतु संक्रमणाबाबत जेवढे समज आहेत, तेवढे गैरसमजही आहेत.घरगुती उपचारामुळे कोरोनाचे संक्रमण बरे होते काय?लसूण, गरम पाण्याने गुळणी करणे, व्हिटॅमिन सी, स्टेरॉईड घेणे असा सल्ला सोशल मीडियावर देण्यात येत आहेत. हा सल्ला काही आजारांसाठी महत्त्वाचा आहे. परंतु कोरोना व्हायरससाठी हा सल्ला योग्य नाही. नागरिकांनी शरीरावर तिळाचे तेल, क्लोरीन किवा अल्कोहोलचा स्प्रे मारणे सुरू केले आहे. मात्र, त्यामुळे दिलासा मिळत नाही. ब्लीचसह ७५ टक्के इथेनॉल पॅरासिटीक अ‍ॅसिड आणि क्लोरोफार्मसारखे काही किटाणुनाशक आहेत, जे कोरोना व्हायरस नष्ट करू शकतात, परंतु कोणतेही किटाणुनाशक पिणे योग्य नाही. ते धोक्याचे ठरू शकते.कोरोना व्हायरसवर उपचार आहे काय?कोविड १९ व्हायरसवर कोणताच उपचार उपलब्ध नाही. त्यावर संशोधन सुरू आहे. लस उपलब्ध होण्यास एक वर्षापेक्षा अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे ज्यांना सर्दी, खोकला आहे, त्यांच्यापासून एक मीटर अंतर ठेवणे हा स्वत:चा बचाव करण्याचा सोपा मार्ग आहे. इतरांशी हात मिळविणे टाळा. कमीतकमी २० सेकंद आपले हात साबणाने धुवावे, खोकला किंवा शिंक आल्यास आपले तोंड आणि नाकावर रुमाल ठेवावा.मास्क वापरणे आवश्यक आहे काय?ज्यांचे आरोग्य चांगले आहे, त्यांना मास्क वापरण्याची गरज नाही. मास्क योग्य पद्धतीने न घातल्यास संक्रमणाचा धोका वाढू शकतो. ज्यांना गरज आहे, त्यांना उपलब्ध होण्यासाठी एन ९५ रेस्पिरेटरचा साठा करू नये. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, जे दुसऱ्याला संक्रमित करण्याची शक्यता आहे आणि रुग्णांची देखभाल करणाऱ्यांनी मास्क वापरावा.तापमानामुळे व्हायरस नष्ट  होतो का?जागतिक आरोग्य संघटनेनुसार हँड ड्रायरने व्हायरस नष्ट होत नाही. अल्ट्रा व्हायलेट किरणेही योग्य नाहीत. ते त्वचेला इजा पोहोचवू शकतात. याची पुष्टी करण्याची कोणतीच पद्धत नाही. उन्हाळ्यात तापमान वाढल्यास व्हायरस नष्ट होतो.कोरोना व्हायरसमुळे मुले संक्रमित होतात का?ही एक अफवा आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती कोरोना व्हायरसमुळे संक्रमित होऊ शकतो. वयस्क आणि ज्यांना आधीच आजार आहे, त्यांना संक्रमणाचा अधिक धोका असतो, तसेच ज्यांना मधुमेह, हृदयाचा आजार, गंभीर अस्थमा, सीओपीडी असेल तरसेच दीर्घकाळापासून  औषधोपचार घेत असतील, त्यांना धोका अधिक असतो. कोरोना व्हायरसमुळे संक्रमित सर्वांचाच मृत्यू होतो का?असे नाही. प्रत्यक्षात यातील बरेच रुग्ण बरे होतात. याच्या प्रारंभिक लक्षणात सर्दी, खोकला, ताप, नाक वाहणे, घशात खवखव आणि डोकेदुखीचा समावेश आहे. यातील बहुतेक लक्षणे एका आठवड्यातच बरी होतात. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, त्यांना धोका असतो. संक्रमितांपैकी ९७ टक्के रुग्ण बरे होतात. हा आजार जाणीवपूर्वक पसरविला आहे का?अनेक व्हायरस वेळेनुसार बदलतात. मात्र, कधी-कधी डुक्कर, मांजर, पक्षी यांच्या शरीरात असलेल्या व्हायरसचा माणसाच्या शरीरात प्रवेश झाला, तर त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. मास्कमुळे आपले रक्षण होऊ शकते का?एन ९५ प्रकारच्या काही मास्कमुळे आपले रक्षण होऊ शकते. तोंड आणि नाक झाकण्यासाठी आपण दुपट्टा किंवा रुमालाचा मास्कसारखा उपयोग करीत असाल, तर आजाराला आपण रोखू शकणार नाही. प्रत्येक वेळी नाकावर आणि तोंंडावर मास्क चढवून ठेवल्याने संक्रमणाचा धोका वाढतो. हा कोरोना आजार महामारी ठरेल काय?सध्या तरी असे म्हणता येणार नाही. मात्र, ज्या चीनमध्ये या आजाराचा जन्म झाला, ते पाहू जाता संक्रमण थांबविण्यासाठी किमान एक महिना लागू शकतो. अन्य व्हायरल संक्रमणाच्या तुलनेत कोरोनामुळे होणारा मृत्युदर बराच कमी आहे. त्यामुळे घाबरण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाय करायला हवा.  

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाHealthआरोग्य