शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही?; विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 20:18 IST

21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पेपरवर अनिश्चिततेचे सावट

मुंबई: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर दहावीला असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. 

सुरुवातीला नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोलाच्या पेपरचा निर्णय 31 मार्चनंतर घेण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र सोमवारी करण्यात आलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाही असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षक साऱ्यांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी 13 ते 23 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही असा गोंधळ आणि चर्चा पालकांमध्ये रंगली आहे. 

राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयाचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, 40 गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर आता पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला. 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी असा सूर पालकांमधून येत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. या ऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याच्या उपाय योजनांकडे शिक्षण विभागाने आता तरी लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावी