शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona virus : कोरोनामुळे झालेला एकही मृत्यू लपविला जाणार नाही: आरोग्यमंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:34 IST

नागरिकांपासून कोरोना संबंधी कुठलीही माहिती लपवायची नाही असे स्पष्ट मत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आहे.

ठळक मुद्देकोरोना संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांच्या तपासणीला प्राधान्य

पुणे : पारदर्शकता व प्रामाणिकता हाच महाविकास आघाडीचा धर्म मानून आम्ही काम करीत आहोत.त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोरोनामुळे झालेला एकही मृत्यू लपविण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या दिवशी यामध्ये जास्त संख्या दिसते, त्यास कारण संबंधित रूग्णांच्या चाचणीचा अहवाल उशिरा आल्याने ती वाढ होत असते. परंतु, अशी वाढही आम्ही लागलीच सांगत असतो. त्यामुळे मृत्यूदर लपविला जातो, चाचण्याचे प्रमाण कमी आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले, देशात सर्वात जास्त कोरोनाच्या चाचण्या मुंबईत झाल्या असून त्यापाठोपाठ पुण्यात झाल्या आहेत.त्यामुळे पुणे शहरात चाचण्याचे प्रमाण कमी आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. आयसीएमआरच्या  मार्गदर्शक सूचनांचे पालन आरोग्य विभागाकडून १०० टक्के केले जात आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांची चाचणी करणे, तसेच कोरोनाबाधिताच्या सर्वाधिक संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यास आमचे प्राधान्य आहे. या संदर्भात पुण्यामुंबईसह सर्वत्र चांगले काम चालू आहे, त्यामुळेच कोरोनाबाधितांचा आकडा जास्त दिसत आहे. दुसरीकडे ज्या अनेक राज्यात चाचण्या होत नाहीत, तेथे ती संख्या वाढत नसल्याचे चित्र आहे. परंतु हे चित्र भविष्याच्यादृष्टीने योग्य नसल्याचेही ते म्हणाले. नागरिकांपासून कोरोना संदर्भातील कोणतीही गोष्ट लपवायची नाही, असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मत आहे. यामध्ये राजकारण होण्याचे कारण नसून, आम्ही सर्व बाबी स्पष्टपणे सांगत आहोत. या उपरही काही बाबी लपविले जात असल्याचे कोणाला वाटले तर त्यांनी त्या सांगाव्यात त्याबाबत खुलासा करण्यासाठी राज्य शासन तयार आहे. दरम्यान जर कोणी जाणीवपुर्वक चुकीचे काम करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही टोपे यांनी स्पष्ट केले. 

---------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे