शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल रोडमुळे चौपाट्यांवर संक्रांत

By admin | Updated: June 9, 2015 04:01 IST

एकीकडे भाजपा-शिवसेनेत कोस्टल रोडच्या श्रेयावरून रस्सीखेच सुरू असतानाच पर्यावरण आणि वाहतूकतज्ज्ञांनी मात्र या प्रकल्पावरच तीव्र आक्षेप घेतला आहे.

गौरीशंकर घाळे, मुंबई एकीकडे भाजपा-शिवसेनेत कोस्टल रोडच्या श्रेयावरून रस्सीखेच सुरू असतानाच पर्यावरण आणि वाहतूकतज्ज्ञांनी मात्र या प्रकल्पावरच तीव्र आक्षेप घेतला आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक समस्या सुटणार असल्याचा दावा फसवा असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील चौपाट्या मात्र नष्ट होतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.बीकेसी आणि वांद्रे-वरळी सागरीसेतूनंतर प्रभादेवी, दादर, वर्सोवा येथील चौपाट्या नष्ट झाल्या. तर मनोरी व गोराईपर्यंतच्या किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धूप झाली. सध्या दादर येथील महापौर बंगल्यासह किनाऱ्याजवळील सर्व इमारतींमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेली दोन वर्षे थेट शिवाजी पार्कपर्यंत समुद्राचे पाणी शिरले. कोस्टल रोडमुळे ही सध्याची समस्या आणखी बिकट होण्याची शक्यता असून, सर्वच चौपाट्या आणि किनाऱ्यालगतची वस्ती पाण्याखाली येण्याची शक्यता असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले. राज्य शासनाच्या विविध समित्यांनी सुद्धा पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली होती. सागरीसेतूबाबत १९८७ साली तत्कालीन मुख्य सचिव के. जी. परांजपे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने सागरात नवीन भराव टाकण्यास मनाई करतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याची शिफारस केली होती. तर १९९४ साली एमएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक धोरणात दक्षिण मुंबईची भौगोलिक रचना पाहता या भागात अधिकची वाहतूक न आणण्याबाबतची सूचना करण्यात आली होती. सागरीसेतू, युतीच्या काळातील ५५ व आघाडी सरकारच्या काळातील ४२ उड्डाणपुलांनंतरही मुंबईतील वाहतूककोंडी पहिली होती तशीच आहे. त्यामुळे रस्ते व पूल निर्मितीचे धोरण सोडून वाहतूक व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ---------सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट व रिक्षा-टॅक्सी रस्त्याचा १६ टक्के भाग व्यापतात आणि ८६ टक्के प्रवासी वाहतूक करतात. तर कार व अन्य छोटी खासगी वाहने ८४ टक्के भाग व्यापूनही त्यातून केवळ १४ टक्के प्रवासी वाहतूक होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर भर देणे आवश्यक आहे.