शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस - राष्ट्रवादीमधील चर्चा निष्फळ

By admin | Updated: September 23, 2014 12:19 IST

आघाडीतील जागावाटपासंदर्भात मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक निष्फळ ठरली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - आघाडीतील जागावाटपासंदर्भात मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक निष्फळ ठरली आहे. मंगळवारी रात्री पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते मुंबईत बैठक घेतील अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. 
युतीपाठोपाठ आघाडीमध्येही जागावाटपावरुन तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे १४४ जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेसने १२४ जागा द्यायची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला ११४ जागा दिल्या होत्या. यंदा लोकसभेत राष्ट्रवादीचा जास्त जागांवर विजय झाल्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १२४ जागा (१० जागा वाढवून) देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली. मात्र राष्ट्रवादीने जास्त जागांची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे कोणत्याही तोडग्याविनाच ही बैठक संपली. रात्री आठनंतर दोन्ही पक्षांचे नेते चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक घेतील अशी माहिती काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दिली. राष्ट्रवादीच्या मागणीविषयी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करु असेही राणेंनी नमूद केले. संध्याकाळच्या बैठकीत आघाडीविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल असे सूत्रांनी सांगितले.