शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ह्यांच्यापेक्षा काँग्रेस- राष्ट्रवादी परवडली : राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 19:37 IST

रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग आणि माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही.

औरंगाबाद : रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग आणि माध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नियंत्रण आहे. कोणाला काही बोलू दिले जात नाही. देशात ही एकप्रकारे आणीबाणीची परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपचा पोरखेळ सुरू आहे, यामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादी परवडली अशी म्हणण्याची वेळ आली आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी (दि. १९) तापडिया नाट्यमंदिरात मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मनसेचे अभिजित पानसे, राजू पाटील, संदीप देशपांडे, आदित्य शिरोडकर, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरी, राजेश येरुनकर, भास्कर गाडेकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, शहर उपाध्यक्ष आशिष सुरडकर, अब्दुल रशीद खान यांची उपस्थिती होती. 

यावेळी ठाकरे म्हणाले, देशात सध्या सदृृढ लोकशाही नाही. नोटाबंदीनंतर देशात साडेतीन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. केंद्र सरकार विकासकामे दाखवू शकत नाही. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दंगली घडविल्या जातात. पुढेही हाच धोका आहे.

नोटाबंदीनंतर भाजपकडे पैसानोटाबंदीचा निर्णय घेताना १६ लाख कोटी रुपये काळा पैसा असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात आता नव्या नोटांचे १८ लाख कोटी रुपये काळा पैसा फिरत असल्याचा अहवाल आहे. नोटाबंदीनंतर भाजपकडे जेवढे पैसे आले तेवढे त्यापूर्वी नव्हते. त्यांच्या हातात रिझर्व्ह बँकच आहे. निवडणुकीत काळा पैसा बाहेर येत आहे, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस- राष्ट्रवादी परवडलीराज ठाकरे म्हणाले, मोदी एक वेळ परवडतील; परंतु मोदीभक्त नको. हे खोटं बोलणारं सरकार असून, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस परवडेल, असे म्हणण्याची वेळ येत आहे. 

पंतप्रधान झाल्यास मोदी बदलले पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण, असे विचारले जाते. परंतु यापूर्वी कधीही पर्याय शोधले जात नसे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे, हे मीच म्हटले. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली. त्यामुळे माझी भूमिकाही आता बदलली आहे.

'लोकमत'चे केले कौतुक सध्या देशात कोणाला काही बोलू दिले जात नाही. ही एकप्रकारची  आणीबाणीच आहे. यावर माध्यमेही बोटचेपी भूमिका घेतात मात्र सरकार विरोधी आवाज उठविण्यात काही माध्यमे अपवाद आहेत असा उल्लेख करत राज ठाकरे यांनी 'लोकमत'सह एका वृत्तवाहिनी व दोन वृत्तपत्रांच्या नावाचा उल्लेख केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसेBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस