शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

“पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 15:35 IST

देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देविरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी काय करतायत - काँग्रेसची विचारणादेवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन नाही - पटोले

मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची स्थिती भयंकर होताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला लॉकडाऊन म्हणणार नाही, असे सांगत कठोर निर्बंध लागू केले. १४ एप्रिल ते १ मे या पंधरा दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असून, यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी जोरदार उत्तर दिले असून, देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि केंद्रातील मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. (nana patole slams devendra fadnavis and modi govt over corona situation)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंध लावल्यानंतर, सरकारने जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन नाही, हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचे जर वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्द्यावर राजकारण करू नये, असा टोला पटोले यांनी लगावला.

भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

पंतप्रधान मोदी काय करतायत

देशात सगळ्याच राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढत चालला असताना पंतप्रधान मोदी काय करत आहेत, अशी विचारणा करत त्यांना केवळ निवडणुका दिसत आहेत. विनामास्क प्रचार करून ते कोणता संदेश देतात, पंतप्रधान प्रचारात मस्त आहेत आणि जनता करोनाने त्रस्त आहे. लोकांचा जीव जातोय. अनेक परिवारांमध्ये करोनामुळे कर्ते लोकं मरण पावले आहेत. कुणीही राजकारण करू नये, असा सल्ला नाना पटोले यांनी दिला आहे. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

सरकारने जाहीर केलेली ३ हजार ३०० कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पातील नियमित तरतूद आहे. त्यामुळे ही कोरोनासाठीची तरतूद नाहीच. त्यामुळे सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. मुंबई-पुणे याव्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे. नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यात काय सुरू आणि काय बंद? पाहा, एका क्लिकवर

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण