शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 6:34 AM

शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल.

अतुल कुलकर्णी 

मुंबई : राष्ट्रवादी व शिवसेनेने सरकार स्थापन करावे आणि काँग्रेसने त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाशी काँग्रेसचे दिल्लीतील नेते तयार नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असे दिल्लीतील नेत्यांचे मत असल्याचे समजते. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसने समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राष्टÑवादी-शिवसेनेचे सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.

शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल, असे या नेत्यांना वाटते. त्यामुळे जेवढे ताणता येईल तेवढे ताणून धरायचे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आमच्या पक्षात बंडखोरी होणार नाही. एखादा आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेला तर त्याच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा केला जाईल आणि त्याला पाडू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार दिल्लीतून येणार आहेत. त्यांची आणि सोनिया गांधी यांची भेट झाली आहे. त्या भेटीची माहिती ते आम्हाला देतील, त्यानंतर चर्चा होईल आणि मग निर्णय घेण्यात येईल. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिलेला नाही, त्यांचा काही निरोप आला तर तो बैठकीत ठेवला जाईल आणि त्यावर चर्चा करू, असेही पाटील म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा द्या; युवा नेत्यांचे मतभाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना अथवा राष्टÑवादीकडून सरकार बनविण्यासाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असे काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे मत आहे. विश्वजीत कदम, अमित देशमुख यांची देखील हीच भूमिका आहे, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीMaharashtraमहाराष्ट्रShiv Senaशिवसेना