शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र 'सुजलाम्' करणारं 'जलयुक्त शिवार'; देवेंद्र सरकारचा बळीराजाला आधार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 17:28 IST

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे अनेक भागांचा कायापालट

२०१४ मध्ये भाजपानं काँग्रेस, राष्ट्रवादीवर सर्वाधिक आरोप केले ते भ्रष्टाचारावरून. त्यातही सर्वात जास्त आरोप झाले ते सिंचन घोटाळ्यावरून. सर्वात जास्त धरणं असलेलं राज्य ही महाराष्ट्राची ओळख. मात्र तरीही महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो. यामागचं प्रमुख कारण म्हणजे दुष्काळामुळे आलेली नापिकी. त्यामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करणं आवश्यक होतं. शेतीला पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. मोठेमोठी धरणं बांधण्यासाठी बराच वेळ आणि खर्च येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'जलयुक्त शिवार'च्या माध्यमातून यावर उत्तर शोधलं. 

जमिनीवर पडणारं पाणी वाहून थेट वाहून जातं. यातलं जास्तीत जास्त पाण्याचं संवर्धन करण्याच्या हेतूनं 'जलयुक्त शिवार'ची घोषणा करण्यात आली. शेतात पडणारं पाणी साठवायचं आणि तेच शेतीसाठी वापरायचं, अशी नाविण्यपूर्ण संकल्पना राज्यातील बहुतांश भागांमध्ये राबवण्यात आली. त्यामुळे दूरवरुन पाणी आणण्याचा प्रश्न मिटला. मोठमोठी धरणं, त्यासाठी येणारा कोट्यवधींचा खर्च, त्यातही पाणी सोडण्यावरुन होणारं राजकारण याला फाटा देण्याचं काम 'जलयुक्त शिवार'नं केलं. 

जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत 'मागेल त्याला शेततळं' देण्यात आलं. शेतात खड्डा खणण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. ही योजना अनेक भागांमध्ये क्रांतीकारी ठरली. जलयुक्त शिवारमुळे शेतकरी त्याच्याच शेतातलं त्याच्याच शेतासाठी वापरू लागला. मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्यानं जलयुक्त शिवाराला केंद्राकडून कोट्यवधींना निधी मिळाला. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या अनेक भागांचं रुपडं पालटलं.

जलयुक्त शिवार योजना येत्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीनंही महत्त्वाची ठरणार आहे. जमिनीत पाणीच मुरत नसल्यानं मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांमधील परिस्थिती गंभीर झाली होती. पाणी उपसण्यासाठी जागोजागी बोअरवेल टाकण्यात आल्यानं भूजल पातळी प्रचंड खालावली होती. मात्र जलयुक्त शिवारमुळे ही परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे ही योजना यापुढेही अशीच सुरू राहिल्यास मराठवाड्यावरील दुष्काळाचा शिक्का पुसला जाऊ शकतो. याचा मोठा आर्थिक फायदा या भागासह संपूर्ण राज्यालादेखील होईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalyukt Shivarजलयुक्त शिवारdroughtदुष्काळFarmerशेतकरी