शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर, भयावह! मुंबईसह महत्त्वाची शहरं बुडणार; महाराष्ट्राची झोप उडवणारा UNचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:28 IST

मुंबईसह देशातील अनेक महत्त्वाची शहरं पाण्याखाली जाण्याची भीती; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

मुंबई: हवामानातील बदल, वाढतं तापमान यांचा परिणाम दिवसागणिक अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. येत्या काही वर्षांत सरासरी तापमान दीड डिग्री सेल्सिअसनं वाढणार असून त्याचा थेट परिणाम जगातील महत्त्वाच्या शहरांवर होणार आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई यांच्यासह समुद्र किनाऱ्यावरील अनेक शहरं बुडण्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्रानं याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

ग्लास्गोमध्ये संयुक्त राष्ट्राकडून जलवायू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाला सुरुवात होण्याच्या आठवडाभर आधी संयुक्त राष्ट्राचा हवामान बदलाविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतातील २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवामान बदलामुळे दुष्काळ आणि पुराची समस्या निर्माण होत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसामचा समावेश आहे. भारताची तब्बल ८० टक्के लोकसंख्या वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंजनं एका अहवालातून जागतिक तापमान वाढीचा धोका अधोरेखित केला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अहवालानुसार, गंगा नदीतील पाण्याचं तापमान वाढत आहे. हिमकडे वितळत असल्यानं गंगा नदीची पाणी पातळी वाढवत असून तापमानातही वाढ होत असल्याची माहिती अहवालात आहे.

समुद्र किनारी वसलेल्या शहरांना जागतिक तापमान वाढीचा सर्वाधिक धोका आहे. पाणी पातळी वाढल्यानं अनेक शहरं बुडण्याचा धोका आहे. जगातील जवळपास १५ कोटी लोकांच्या घरात भरतीवेळी पाणी जाऊ शकतं. भारतातील ३.५ कोटी लोकांना अशा प्रकारच्या धोक्याला तोंड द्यावं लागू शकतं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तापमान वाढीचा मोठा धोका आहे. मुंबईतील निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या वर्षागणिक वाढत जाईल. २१०० पर्यंत शहरातील काही भाग पाण्याखाली गेलेले असतील.

टॅग्स :floodपूर