शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भयंकर, भयावह! मुंबईसह महत्त्वाची शहरं बुडणार; महाराष्ट्राची झोप उडवणारा UNचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:28 IST

मुंबईसह देशातील अनेक महत्त्वाची शहरं पाण्याखाली जाण्याची भीती; संयुक्त राष्ट्राचा अहवाल

मुंबई: हवामानातील बदल, वाढतं तापमान यांचा परिणाम दिवसागणिक अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. येत्या काही वर्षांत सरासरी तापमान दीड डिग्री सेल्सिअसनं वाढणार असून त्याचा थेट परिणाम जगातील महत्त्वाच्या शहरांवर होणार आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई यांच्यासह समुद्र किनाऱ्यावरील अनेक शहरं बुडण्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्रानं याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

ग्लास्गोमध्ये संयुक्त राष्ट्राकडून जलवायू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाला सुरुवात होण्याच्या आठवडाभर आधी संयुक्त राष्ट्राचा हवामान बदलाविषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारतातील २५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हवामान बदलामुळे दुष्काळ आणि पुराची समस्या निर्माण होत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि आसामचा समावेश आहे. भारताची तब्बल ८० टक्के लोकसंख्या वास्तव्यास असलेल्या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेंट चेंजनं एका अहवालातून जागतिक तापमान वाढीचा धोका अधोरेखित केला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अहवालानुसार, गंगा नदीतील पाण्याचं तापमान वाढत आहे. हिमकडे वितळत असल्यानं गंगा नदीची पाणी पातळी वाढवत असून तापमानातही वाढ होत असल्याची माहिती अहवालात आहे.

समुद्र किनारी वसलेल्या शहरांना जागतिक तापमान वाढीचा सर्वाधिक धोका आहे. पाणी पातळी वाढल्यानं अनेक शहरं बुडण्याचा धोका आहे. जगातील जवळपास १५ कोटी लोकांच्या घरात भरतीवेळी पाणी जाऊ शकतं. भारतातील ३.५ कोटी लोकांना अशा प्रकारच्या धोक्याला तोंड द्यावं लागू शकतं. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तापमान वाढीचा मोठा धोका आहे. मुंबईतील निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या वर्षागणिक वाढत जाईल. २१०० पर्यंत शहरातील काही भाग पाण्याखाली गेलेले असतील.

टॅग्स :floodपूर