शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 3:17 PM

हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

नागपूर: नागपूरात आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा घटनाबाह्य असल्याचे सांगत या कायद्या विरोध केला. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करु नये अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा कायदा माझ्या जातीविरुद्ध असल्याचे सांगितले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझी जात वंजारी आहे व नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध आहे. माझ्या जातीमधील 50 टक्के लोकं शेतमजुरी करतात. शेतमजुरी करत असताना शेतामध्येच त्यांचे बाळांपण होतं. त्यामुळे त्यांच्याकडे दाखले नाहीत. त्यामुळे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नसल्याने ते नागरिकत्व कोणत्या आधारे सिद्ध करणार असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

भारतामध्ये माझ्या जातीसारख्या सहा हजार जाती आहेत की ज्यांच्याकडे घर किंवा दाखले नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे ही लढाई गरीब जनता आणि श्रीमंत जनता अशी आहे. ही लढाई मलबार हिलमध्ये राहणारा माणूस आणि गडचिरोलीत राहणाऱ्या माणासांशी असून हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतातील राज्यांत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात पसरले असून, त्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात कँटिन, वाचनालय व वर्गात शिरून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हैदराबाद, तामिळनाडू, लखनऊ, बंगळुरू, चेन्नई, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काल जोरदार निदर्शने करण्यात आली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात कोलकातामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShiv SenaशिवसेनाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार