शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

पुण्याचा लॉकडाऊन उठवायला मुख्यमंत्र्यांचा विरोध होता; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 16:40 IST

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर टीकेटी झोड उठली आहे. त्यांना अॅम्बुलन्स न मिळाल्याने प्राण गमवावे लागले होते. यावर राऊत यांना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आले.

मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात झाला आहे. यामुळे आता पुण्यामध्ये अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. या परिस्थितीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तेथील लॉकडाऊन घाईघाईने उठविण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. 

कोरोनाचे संक्रमणाचा धोका पुण्यात वाढत आहे. तिथे अधिक लक्ष द्यायला हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आधीपासूनचे म्हणणे होते. तिथे घाईघाईने लॉकडाऊन उठविण्यात आला, त्यालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोध होता, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. 

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यावरून राज्य सरकारवर टीकेटी झोड उठली आहे. त्यांना अॅम्बुलन्स न मिळाल्याने प्राण गमवावे लागले होते. यावर राऊत यांना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आले. यावर राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथे उभारण्यात आलेली कोविड सेंटर व्यवस्थित सुरू आहेत. काही त्रुटी असू शकतात. पुण्यातील कोविड सेंटरमध्ये सुविधा उपलब्ध होण्याआधीच ते सुरू करण्यात आलं होतं, असं आता समोर आलंय. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला दोष देण्याची पद्धत चुकीची आहे.

पांडूरंग रायकरांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करण्यात आली, असे मला समजले आहे. दुर्दैवानं त्यांना अँब्युलन्स मिळायला उशीर झाला. पुण्यासारख्या शहरात हे होणं बरोबर नाहीय. सरकारने यापुढे काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. 

पुण्यात आता मुंबई पॅटर्नपुण्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुंबई पॅटर्न राबविला जात आहे. काही अडचणी असतील त्या दूर करून जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील याची जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे. राज्य सरकार किंवा महापालिकाच नाही, तर विरोधकांचीही जबाबदारी आहे, जनता आणि शहर हे सर्वांचेच आहे, असे राऊत म्हणाले. 

मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेPuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस