शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

राज्यातील हिंसाचारामागं मोठी शक्ती; भाजपा-मनसे युतीबाबतही रावसाहेब दानवेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 8:23 PM

विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.

नाशिक – त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. अमरावती, नांदेड मालेगाव येथे हिंसक आंदोलन सुरु झालं आहे. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र राज्यातील या वातावरणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. राज्यातील हिंसाचारामागं एखादी मोठी शक्ती आहे असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी केला आहे.

नाशिक येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रावसाहेब दानवेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण हटवलं जात आहे. त्रिपुरात मस्जिद पाडली असेल तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटले? यामागे एखादी शक्ती आहे. संजय राऊतांचा आढावा घ्यायचा असेल तर वेगळी प्रेस घ्यावी लागेल. विधानसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट कौल जनतेने दिला पण दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार स्थापन केले. या राज्यातली जनता सरकारवर नाराज आहे. २०२४ मध्ये भाजपा स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करून दाखवू असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच भाजपामनसे युतीबाबत दानवेंनी सूचक विधान केले आहे. मनसे जो पर्यंत परप्रांतीय मुद्द्याबाबत बदल करत नाही तो पर्यंत मनसे भाजप युती शक्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात गेले. शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या. सरकारने दोन वेळेस पंचनामे केले पण मदत मिळाली नाही. दुष्काळ जाहीर केलाच नाही. विमा देखील शेतकऱ्याला मिळाला नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंब शासनाच्या दारात बसून मागण्या मागत आहेत. सरकारकडून समाधानकारक चर्चा नाही. मेडिकलच्या परीक्षा दोनदा पुढे ढकलल्या. दिलेल्या तारखेला शाळा सुरु झाल्या नाहीत. मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियांच्या धंद्यात आहेत आणि चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर रावसाहेब दानवेंनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMNSमनसेBJPभाजपा