शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:05 IST

भारत-पाकिस्तान मॅचला फारसा प्रतिसाद मिळत नाही. जय शाह उद्या मॅच पाहायला गेले, त्यांना देशद्रोही ठरवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

मुंबई - ज्या पाकिस्तानसोबत आपण युद्ध पुकारलं होते, त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट मॅच खेळतोय. ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात आपले शिष्टमंडळ मोदींनी पाठवले होते. मात्र आता देशभक्तीची थट्टा नाही तर देशभक्तीचा व्यापार चालवला आहे. सीमेवर जवान शहीद होणार,  भारतीय नागरिकांना हिंदू म्हणून गोळ्या घातल्या, मग देशापेक्षा, हिंदुत्वापेक्षा भाजपाला व्यापार मोठा वाटतो का? . भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकून आपण दहशतवादाविरोधात आहोत हे दाखवून देण्याची संधी पंतप्रधानांना आहे. आपण कुठलेही संबंध पाकिस्तानसोबत ठेवणार नाही हे जाहीर करावे अशी मागणी करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. 

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध करत आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. आता पाकिस्तानसोबत मॅच खेळली जाते. आम्ही याचा निषेध म्हणून राज्यभर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घराघरातून सिंदूर जमा करून पंतप्रधान कार्यालयाला पाठवले जातील. हर घर से सिंदूर अभियान आम्ही राबवतोय. अजूनही वेळ गेली नाही. ही मॅच होणार नाही हे मोदींनी दमदारपणे सांगायला हवे. पहलगाम हल्ल्यात महिलांचे सौभाग्य उजाडले त्यानंतर देशभक्तीच्या नावाखाली भाजपा दांडियाचं आयोजन करत आहे. भारत-पाकिस्तान मॅचला फारसा प्रतिसाद मिळत नाही. जय शाह उद्या मॅच पाहायला गेले, त्यांना देशद्रोही ठरवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच आपल्या देशाला कणखर पंतप्रधान लाभेल म्हणून आम्ही पाठिंबा दिला होता. मात्र कणा हिन सरकार असल्याने पाकव्याप्त काश्मीर आपल्या देशात हे पंतप्रधान आणू शकतील यावर मला आता विश्वास नाही. जावेद मियादाँद मातोश्रीवर आला होता, त्याला ठणकावून भारत-पाकिस्तान मॅच होऊ देणार नाही असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र यांचे नेते न सांगता नवाज शरीफांच्या वाढदिवशी केक खायला गेले होते. त्यामुळे भाजपाने आम्हाला देशभक्ती शिकवू नये. सगळीकडे व्यापार सुरू ठेवला आहे.  क्रिकेट सामन्यातून मिळणारे पैसे देशापेक्षा मोठे आहे का असंही उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारले. 

दरम्यान, भाजपाने देशभक्तीचा व्यापार सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्याला ३-४ महिने झाले असतील. त्यात आपले भारतीय नागरिक ज्यारितीने मारले गेले. बहिणीचं कुंकू पुसले गेले. आजही ही जखम भरली नाही. पाकिस्तान आपल्या देशात दहशतवाद पसरवतो, हल्ले करतो. त्याविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. आपल्या भारतीय सैन्याने कठोर उत्तर पाकला दिले. आपले सैन्य पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेईल असं वाटत होते. परंतु आपल्या सैन्याला थांबवण्यात आले. हे युद्ध कुणी थांबवले? युद्ध थांबवणारे कोण आहेत? खून और पानी साथ मै नही बह सकता, मग क्रिकेट आणि खून एकत्र कसे होऊ शकतात. यांना फक्त क्रिकेट मॅचमधून पैसा कमवायचा आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेIndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी