शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:27 IST

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. परंतु, युतीची चर्चा अद्याप अंतिम झाली नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेकांना विधानसभेची तयारी सुरू केली आहे. ही स्थिती शिवसेना आणि भाजप यांच्यात आहे. परंतु, भाजपमधून निवडणूक लढविल्यास हमखास विजय असं समीकरण झाल्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी भाऊगर्दी वाढली आहे. मात्र युतीचं फायनल होण्यापूर्वीच  भाजपमध्ये गटबाजीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.  

2014 विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे यांच्याविरुद्ध लढताना भाजप दुसऱ्या स्थानी होते. तर शिवसेना तिसऱ्या स्थानी फेकल्या गेली होती. त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी मागणी होत आहे. वास्तविक पाहता घनसावंगी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढान यांनी तयारी सुरू केली आहे.

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे  राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

युतीवर बरच काही निर्भर2014 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाला जागा सोडण्याचा निकष ठरविण्यात आल्याचे समजते. त्यानुसार घनसावंगी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजप-सेनेचे एकगठ्ठा मतं युतीच्या उमेदवाराला मिळतील. त्यातच वंचितच्या उमेदवारावर बरच काही अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत फायदा पुन्हा युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीवर बरच काही अवलंबून असणार आहे.

उमेदवारीसाठी बापू-बापू आमने सामने

भाजपकडून 2014 मध्ये ऐनवेळी विलासबापू खरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दाखल झालेले भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बापू आर्दड यांनीही घनसावंगीतून उमेदवारी मिळविण्यासाठी मजबूत फिल्डींग लावली आहे. एकूणच विलासबापू आणि सुनीलबापू यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. एकाचवेळी दोन्ही नेते बैठकांचे आयोजन करत आहे. त्यामुळे कोणाच्या बैठकीला जावं, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडत आहे. मात्र ही गटबाजी कायम राहणार की, उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंद होईल, हे तर येणारा काळच सांगणार आहे. त्याआधी सर्वांच्या नजरा युती होणार का याकडे लागल्या आहेत.