शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:27 IST

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. परंतु, युतीची चर्चा अद्याप अंतिम झाली नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेकांना विधानसभेची तयारी सुरू केली आहे. ही स्थिती शिवसेना आणि भाजप यांच्यात आहे. परंतु, भाजपमधून निवडणूक लढविल्यास हमखास विजय असं समीकरण झाल्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी भाऊगर्दी वाढली आहे. मात्र युतीचं फायनल होण्यापूर्वीच  भाजपमध्ये गटबाजीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.  

2014 विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे यांच्याविरुद्ध लढताना भाजप दुसऱ्या स्थानी होते. तर शिवसेना तिसऱ्या स्थानी फेकल्या गेली होती. त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी मागणी होत आहे. वास्तविक पाहता घनसावंगी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढान यांनी तयारी सुरू केली आहे.

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे  राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

युतीवर बरच काही निर्भर2014 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाला जागा सोडण्याचा निकष ठरविण्यात आल्याचे समजते. त्यानुसार घनसावंगी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजप-सेनेचे एकगठ्ठा मतं युतीच्या उमेदवाराला मिळतील. त्यातच वंचितच्या उमेदवारावर बरच काही अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत फायदा पुन्हा युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीवर बरच काही अवलंबून असणार आहे.

उमेदवारीसाठी बापू-बापू आमने सामने

भाजपकडून 2014 मध्ये ऐनवेळी विलासबापू खरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दाखल झालेले भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बापू आर्दड यांनीही घनसावंगीतून उमेदवारी मिळविण्यासाठी मजबूत फिल्डींग लावली आहे. एकूणच विलासबापू आणि सुनीलबापू यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. एकाचवेळी दोन्ही नेते बैठकांचे आयोजन करत आहे. त्यामुळे कोणाच्या बैठकीला जावं, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडत आहे. मात्र ही गटबाजी कायम राहणार की, उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंद होईल, हे तर येणारा काळच सांगणार आहे. त्याआधी सर्वांच्या नजरा युती होणार का याकडे लागल्या आहेत.