शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

घनसावंगीत युतीचं ठरण्यापूर्वीच भाजपमध्ये गटबाजी ! शिवसेनाही मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:27 IST

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. परंतु, युतीची चर्चा अद्याप अंतिम झाली नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अनेकांना विधानसभेची तयारी सुरू केली आहे. ही स्थिती शिवसेना आणि भाजप यांच्यात आहे. परंतु, भाजपमधून निवडणूक लढविल्यास हमखास विजय असं समीकरण झाल्यामुळे भाजपमधून उमेदवारीसाठी भाऊगर्दी वाढली आहे. मात्र युतीचं फायनल होण्यापूर्वीच  भाजपमध्ये गटबाजीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.  

2014 विधानसभा निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. त्यावेळी घनसावंगी मतदार संघातून राजेश टोपे यांच्याविरुद्ध लढताना भाजप दुसऱ्या स्थानी होते. तर शिवसेना तिसऱ्या स्थानी फेकल्या गेली होती. त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळावा अशी मागणी होत आहे. वास्तविक पाहता घनसावंगी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यानुसार शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढान यांनी तयारी सुरू केली आहे.

2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे  राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे.

युतीवर बरच काही निर्भर2014 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाला जागा सोडण्याचा निकष ठरविण्यात आल्याचे समजते. त्यानुसार घनसावंगी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत भाजप-सेनेचे एकगठ्ठा मतं युतीच्या उमेदवाराला मिळतील. त्यातच वंचितच्या उमेदवारावर बरच काही अवलंबून असणार आहे. अशा स्थितीत फायदा पुन्हा युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीवर बरच काही अवलंबून असणार आहे.

उमेदवारीसाठी बापू-बापू आमने सामने

भाजपकडून 2014 मध्ये ऐनवेळी विलासबापू खरात यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दाखल झालेले भाजयुमोचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बापू आर्दड यांनीही घनसावंगीतून उमेदवारी मिळविण्यासाठी मजबूत फिल्डींग लावली आहे. एकूणच विलासबापू आणि सुनीलबापू यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. एकाचवेळी दोन्ही नेते बैठकांचे आयोजन करत आहे. त्यामुळे कोणाच्या बैठकीला जावं, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडत आहे. मात्र ही गटबाजी कायम राहणार की, उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंद होईल, हे तर येणारा काळच सांगणार आहे. त्याआधी सर्वांच्या नजरा युती होणार का याकडे लागल्या आहेत.