शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 12:22 IST

सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला थेट तुमची खाट का कुरकुरतेय असा सवाल विचारण्यात आला. यावरूनचच भाजपाने महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

मुंबई - 'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही.  सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये' असा इशारावजा सल्ला शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसला थेट तुमची खाट का कुरकुरतेय असा सवाल विचारण्यात आला. यावरूनचच भाजपाने महाविकास आघाडी सरकारला आता टोला लगावला आहे. सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे.  

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असताना सरकारला मात्र फक्त खुर्चीची चिंता आहे असा टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनी मंगळवारी महाविकास आघाडी सरकारमधील मंडळी खाटेवरून चर्चा करत असल्याने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील रुग्णालयात खाट (बेड) उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं सध्याचं चित्र आहे. असं असताना यांना लोकांच्या मृत्यूची चिंता नसल्याने त्याचं दु:ख होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी फक्त खुर्चीच्या विचारात मग्न आहे. सामनातून काँग्रेस-राष्ट्रवादीची लाज काढली?, काँग्रेस-राष्ट्रवादीत स्वाभिमान शिल्लक आहे का? असा सवालही राम कदम यांनी विचारला आहे. 

उद्धव ठाकरे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले. सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे ठरले. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असा सल्ला देताना काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.  

विधान परिषदेच्या जागांवरूनही काँग्रेसला शिवसेनेने सुनावले आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार जागा वाटप व्हायला हरकत नसल्याचे सांगत त्यांना विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यासाठी शिवसेनेने एक कॅबिनेट मंत्रिपद काँग्रेसला दिले, याचीही आठवण करून देण्यात आली आहे. काँग्रेसला जागांच्या प्रमाणात खूप काही मिळाले. समान वाटप झाले असते तर एवढे मिळालेच नसते, असा टोला लगावतना मुख्यमंत्र्यांना त्या बदल्यात सहा महिन्यांत कोणाची खाट कुरकुरली असे झाले नाही. यामुळे पुन्हा पहाटे राजभवनाचे दरवाजे उघडले जातील अशा भ्रमात राहू नये, असा इशारा काँग्रेससह भाजपाला देण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार

CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण

CoronaVirus News : दिलासादायक! 'या' टेस्ट किटने चाचणी केली जाणार; फक्त 30 मिनिटांत कोरोनाचं निदान होणार

CoronaVirus News : जूनमध्ये 'या' दिवशी कोरोना व्हायरस होणार नष्ट?; शास्त्रज्ञाचा अजब दावा

Sushant Singh Rajput Suicide : "आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, न्यायालयीन चौकशी केली जावी"

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस