शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विधानसभेला भाजपा १५५ जागा लढण्याच्या तयारीत; शिवसेना-NCP ला किती जागा सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 08:50 IST

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून सर्वाधिक जागा लढवण्यासाठी भाजपा नेते आग्रही आहेत. त्यात शिवसेना-राष्ट्रवादीनेही जागांची मागणी केली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर भाजपानं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. दिल्लीत झालेल्या भाजपा नेत्यांच्या बैठकीनंतर राज्यातील विधानसभेसाठी रणनीती आखणं सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे. त्यातून येत्या विधानसभेला भाजपा १५५ जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं आहे.

महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेनं १०० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ८० ते ९० जागांची मागणी केली असताना भाजपाकडून १५५ जागा लढण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाच्या बैठकीत पक्षाने १५५ जागा तर शिवसेनेसाठी ६०-६५ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ५०-५५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. 

लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून मिशन ४५ प्लस यानुसार काम करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात महायुतीनं फक्त १७ जागांवर विजय मिळवला. ४८ पैकी ३० जागांवर महाविकास आघाडीने महायुतीला पराभूत केले तर सांगलीच्या एका जागेवर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला. विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने महाविकास आघाडी ३१ जागांवर निवडून आलीय. तर लोकसभेत भाजपाला अवघ्या ९ जागा, शिवसेनेला ७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं १ जागा जिंकली आहे.

ही चुकीची माहिती - शिवसेना

कोणत्या पक्षाच्या कोअर कमिटीत घेतलेला निर्णय म्हणजे महायुतीचा निर्णय समजायचं काही कारण नाही. जागावाटपाबाबत अशी कोणतीही बोलणी नाहीत, कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. विधानसभा अधिवेशनाच्या काळात किंवा त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची एकत्रित बैठक होईल. त्या बैठकीत यावर चर्चा होईल. कोणता मतदारसंघ कुणाला सोडायचा, जागावाटप कसं होईल यावर सविस्तर चर्चा होईल. हा एका बैठकीतला विषय नाही. चर्चेच्या २-४ फेऱ्या होतील. त्यात ३ प्रमुख नेते एका निर्णयावर येतील आणि फॉर्म्युला ठरेल तेव्हाच जागावाटप जाहीर केले जाईल असं म्हणत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी जागावाटपाबाबत समोर आलेली माहिती चुकीची आहे असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Mahayutiमहायुतीvidhan sabhaविधानसभाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे