शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:20 IST

BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे.

BJP Chandrashekhar Bawankule News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो असे यश मिळाले. त्यातही भाजपा पक्ष क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु, यानंतर शपथविधीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक टप्प्यांवर महायुतीत मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून महायुतीत असलेली धुसपूस अद्यापही शमलेली नाही. यातच महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते. यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाकित केले आहे. 

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला गेले. यावरून महायुतीत श्रेयवाद सुरू झाल्याची टीका होऊ लागली. यावरही बावनकुळे यांनी उत्तर दिले. पर्यटकांना सुखरूप आणण्याच्या प्रयत्नाला कोणी श्रेयवाद म्हणत असेल तर दुर्दैवाची बाब आहे. यात राजकारण करणे योग्य नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील

एका सभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०३४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काश्मीरला भेट दिली. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी पहलगामला गेले चांगलेच आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन यातून पुढे जायच आहे. देश मजबूत करायच आहे. पाकिस्तानी नागरिकांबाबत केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे तो देशाकरता महत्त्वाचा आहे. या देशाला अखंड ठेवण्याकरता महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तंतोतंत पालन राज्य सरकार करेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती