शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:57 IST

पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा-जेडीयू यांच्या नेतृत्वात एनडीएने दमदार कामगिरी केली आहे. परंतु महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बिहारची निवडणूक स्वबळावर लढवली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उभ्या केलेल्या या उमेदवारांना अत्यंत नगण्य मतदान झाले. सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. पक्षावर ओढावलेल्या या नामुष्कीबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर धक्कादायक होते. या उत्तरामुळे अजित पवारांना न सांगताच बिहारची निवडणूक राष्ट्रवादीने लढवली का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर अजित पवार म्हणाले की, बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका असं मी सांगितले होते. त्यानंतरच्या काळात आमच्या इथं वरिष्ठ पातळीवर प्रफुल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी तिथे जास्त लक्ष दिले नव्हते, मी महाराष्ट्रात होतो. त्यामुळे मला त्याबाबत अधिकची माहिती नाही असं विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीने बिहारमध्ये १६ जागांवर उमेदवार उभे केले होते. 

बिहारमध्ये राष्ट्रवादीची काय झाली अवस्था?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. परंतु, यातील एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना ५०० मतेही मिळाली नाहीत. सासाराम विधानसभा मतदारसंघात आशुतोष सिंह यांना केवळ ११२ मते पडली. जिथे नोटालाही ३७० हून अधिक मते पडली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, जर एखाद्या उमेदवाराला मतदारसंघातील एकूण मतांच्या १६ टक्के मते पडली नाही तर त्याचे डिपॉझिट जप्त होते. 

बिहारमध्ये NDA ची जबरदस्त कामगिरी

स्वातंत्र्यानंतरचा सर्वाधिक मतदानाचा विक्रम नोंदविणाऱ्या बिहारमध्ये मतदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, त्यांचा युनायटेड जनता दल, भारतीय जनता पक्ष व या सर्वांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर पुन्हा, तोदेखील अधिक विश्वास टाकला आहे. २४३ सदस्यांच्या विधानसभेत पंधरा वर्षांनंतर आघाडीने दोनशेच्या जवळ नेले आहे. बिहारच्या इतिहासात भारतीय जनता पक्ष प्रथमच पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. गेल्या, २०२० च्या निवडणुकीत नितीश कुमार भाजपसोबत होते. रालोआला १२२ जागांचे काठावरचे बहुमत मिळाले. नंतर नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. दोन वर्षांनंतर तेजस्वीऐवजी भाजपसोबत संसार मांडला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: Pawar Unaware? NCP's Poor Show, Internal Decisions Questioned.

Web Summary : Ajit Pawar claims ignorance regarding NCP contesting Bihar elections, citing Prful Patel's decisions. NCP's candidates performed poorly, losing deposits. NDA secured a strong victory in Bihar. Pawar expressed he advised against contesting.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Praful Patelप्रफुल्ल पटेलBJPभाजपा